Wednesday, June 10, 2026
Homeदेसाईगंजफक्त टक्केवारी.....काम आणा... द्या टक्केवारी ! काम करा... द्या टक्केवारी- काम बरोबर...

फक्त टक्केवारी…..काम आणा… द्या टक्केवारी ! काम करा… द्या टक्केवारी- काम बरोबर नाही; वाटा पैसे…..झकास कसे होणार काम…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- कोणत्याही क्षेत्रातील काम असो सर्वांची कामावरील ही नियोजित ठरलेली टक्केवारी असतेच.मात्र याला काहीजण अपवाद सुद्धा आहेत.आपण नेहमी म्हणतो की शासकीय वा इतर कामे झकास ऐवजी भकास कां बरं होतात; याचे मुख्य कारण म्हणजे खालच्या स्तरापासून तर वरच्या स्तरापर्यंत सगळ्यांची टक्केवारी ठरलेली आहे.कुणी ५% घेतो,कुणी १०% घेतो, कुणी १५% तर कुणी किती टक्के घेईल याचा नेम नाही.काहींच्या मते,कामे आणण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत असते.त्याही ठिकाणी टक्का हा पक्का वापरला जातोच.अन्यथा दाम नाही तर काम नाही.

कामे आणल्यानंतर आयत्या बिळात नागोबा असणारे बिळातून डोके वर काढून पाहू लागतात.त्यांनाही टक्का हा पक्का होण्यासाठी द्यावाच लागतो.या सर्व प्रकारा नंतर ‘चलती का नाम गाडी’ हे करावेच लागते.मात्र गाडी यावरच कुठे थांबते; काम करतांना इकडून-तिकडून भटकंती करून येणारे हा बरोबर नाही; तो बरोबर नाही; असे करीत असल्याने ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ असे करावेच लागत असल्याने याला एकच उपाय ‘खिसा गरम तर पडला नरम’ इथपासून तर थेट टॉकीज पर्यंत चित्रपट चालवायचा असल्याने अभिनेते,खलनायक,नायिका यांना हातात हात घालून चालावेच लागत असल्याने झकास कामाची प्रचिती येत असते.

या सर्व प्रकारांवरून काम झकास ऐवजी भकास तर होणारच; असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!