Monday, August 24, 2026
Homeकोंढाळाजगाचा पोशिंदा सापडला महागाईच्या विळख्यात..- शेती झाली न परवडणारी; शेतीचे उत्पादन जैसे...

जगाचा पोशिंदा सापडला महागाईच्या विळख्यात..- शेती झाली न परवडणारी; शेतीचे उत्पादन जैसे थे..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कोंढाळा :- देशाचा नाही तर जगाचा पोशिंदा म्हटले जाणाऱ्या शेतकरी बांधवांची अवस्था बिकट स्वरूपाची झाली आहे.शेती मध्ये पाहिजे तेवढे उत्पन्न होतांना दिसून येत नाही.लागत खर्च जास्त तर उत्पादन कमी अशी अवस्था शेतकरी बांधवांची झाली असल्याने सध्याच्या काळात महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.दिवसेंदिवस महागाईचा वणवा वाढत चालला आहे.यामधे शेतकरी होरपळत आहे.डिझेलची,पेट्रोलची दरवाढ सातत्याने होत आहे.दोन वर्षांत रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडले आहेत.किटकनाशक औषधीचे दर वाढत चालले आहेत.शेतीत उत्पादन मात्र जेवढे आहे तेवढेच आहे.मात्र याचा आर्थिक फटका शेतकरी कुटुंबांना बसत आहे.पूवीच्या काळात शेतीला मोठे महत्व होते.एका शेतकऱ्याजवळ २० ते ५० एकर शेती असायची त्यावर कुटुंबाचा गाडा शेतकरी ओढत असायचा.

शेतकरी कुटुंबात आता नातेवाईकांची संख्या वाढत चालली आहे.शिवाय शेतीचे चार पट ते पाच पट तुकडे पडत आहेत.शेतकऱ्याच्या लोकसंख्येच्या मानाने निव्वळ शेतीवरच कुटुंबाचा खर्च चालविणे आता अवघड जात आहे.त्यामुळे शेतीचा व्यवसाय शेतकऱ्यांना न परवडणारा झाला आहे.काही शेतकऱ्यांची मुले उच्च शिक्षण घेऊन शहरात उच्च पदावर विराजमान झाले आहेत.मात्र काही कुटुंबे अजूनही शेतीवरच अवलंबून असल्याचे वास्तव चित्र नजरेसमोर प्रत्यक्ष दिसून येत आहे.

शेतीला जोडधंदा करुनही पाळीव जनावरांवरही रोगराईचे संकट येत आहे.उत्पादन कमी मात्र उत्पादन खर्च जास्त वाढत आहे.शेती व्यवसायासोबत पशुपालनाचा व्यवसायही तोट्यात येत आहे. दिवसेंदिवस महागाई गगनाला भिडत आहे. पूर्वीसारखे पशुधनही शेतकऱ्याजवळ नसल्याने शेतकऱ्यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड जात आहे.शेतीचे उत्पादन मात्र जेवढे आहे तेवढेच असून शेतमालालाही पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा कल आता दुसऱ्या व्यवसायाकडे वाढलेला दिसून येतो.मात्र शेतकरी बांधवांची अवस्था ‘जैसे थे’ पहावयास मिळत असल्याने शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक दिसून येतात.सततची नापिकी,अस्मानी संकट,किडीचा प्रादुर्भाव अशा विळख्यात शेत्या सापडल्याने काय करावे?असा प्रश्न शेतकरी बांधवांपुढे उभा येऊन ठाकला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

शेतावर गेला ‘तो’ घरी परतलाच नाही; आज सापडला मृतदेह.. – कोंढाळा येथील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-शेतावर धानपिकाला खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी चक्क मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा...

देसाईगंज ठाणेदारांची सट्टा-पट्टी व्यवसायावर धाड; ११ जण गजाआड.. – दुचाकी वाहनांसह साहित्य नेले उचलून..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील विविध गावात सट्टा-पट्टी व्यवसायाला मोठे उधाण आल्याची बाब उघडकीस येताच नव्याने रुजु झालेले देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!