- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा(गडचिरोली):-हल्ली चंद्रपूर जिल्ह्यात मानवी जीवांवर वाढते वन्य प्राण्यांचे हल्ले वन विभागासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.काल, सोमवारी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील चकनिंबाळा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक-३७७ मध्ये चवताळलेल्या वाघाने अवघ्या २१ वर्षीय तरुणावर हल्ला चढवून ठार केल्याची घटना घडल्याने परिसरातील गावांमध्ये वाघाची प्रचंड दहशत पसरून नागरिक भयभीत झाले आहेत. चालू वर्षात एकट्या चंद्रपूर जिल्ह्याच्या विविध भागात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल नऊ जणांचा बळी गेला आहे.अश्यातच आता देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा-मेंढा शेतशिवारात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याची घटना नुकतीच उघडकीस आल्याने शेतकरी बांधवांसह गावकरी धास्तावले आहेत.विशेष म्हणजे, सोमवारच्या रात्री अकरा वाजेच्या सुमारास वाळू डेपोवरील काही नागरिकांना शेत शिवारात बिबट्याचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.कोंढाळा गावापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर पश्चिमेस मेंढा मार्गे शेतकरी बांधवांच्या शेत्या आहेत.सध्या उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आल्याने गावातील तसेच लगतच्या कुरुड गावातील शेतकरी दिवसा तसेच रात्रीच्या सुमारास शेतीला पाणी करण्यासाठी व इतर कामांसाठी शेतबांधावर जात असतात.त्यातच,काल सोमवारच्या रात्री अकरा वाजेच्या सुमारास वाळू डेपोवरील काही नागरिक लगुशंकेसाठी उठले असता शेतशिवारात बिबट्या दिसून आला.प्रसंगावधान साधून उपस्थित नागरिकांनी आरडा-ओरड करताच बिबट्याने पळ काढला.सदरचा बिबट्या नजरेस पडल्याने मोठा अनर्थ टळला असला तरीही एखादी अनुचित घटना घडण्यापूर्वी वन विभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
- Advertisement -

