- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
सोलापूर :-जिल्ह्याच्या सांगोला शहरातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे.उद्या,१८ मार्च रोजी होणाऱ्या दहावी बोर्डाच्या भूगोल विषयाच्या पेपरच्या तब्बल ५० प्रश्नपत्रिकांचा एक संच आज,मंगळवार १७ मार्च रोजी सांगोला शहराच्या सांगोला विद्यामंदिर या परीक्षा केंद्रातील स्ट्राँग रूममधून चोरीला गेल्याचे उघडकीस आल्याने शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.सदरची चोरी ही आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली.अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास स्ट्राँग रूमचे कुलूप तोडून प्रश्नपत्रिकांचा संच लंपास केले.
सध्या राज्यात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा सुरू आहेत.उद्या, बुधवारी १८ मार्च रोजी भूगोल विषयाचा पेपर आहे. अश्यातच आज शिक्षण विभाग व कस्टोडियन हे काल सोमवारचे उरलेले पेपर पोस्टाच्या माध्यमातून बोर्डाला पाठवण्यासाठी गेले असता,त्यांना स्ट्राँग रूमचे कुलूप तोडल्याचे दिसून आले.त्यावेळेस सदरची चोरी निदर्शनास आली.धक्कादायक बाब म्हणजे, स्ट्राँग रूम समोरील सीसीटीव्ही बंद असल्याने चोरीचे कोणतेही फुटेज उपलब्ध नाही.भूगोल विषयाचा पेपर चोरीला गेल्याची माहिती मिळताच सोलापूरचे एसपी प्रीतम कुमार यावलकर,डीवायएसपी बसवराज शिवपुजे व स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर,जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांनी शिक्षणाधिकारी कादर शेख,शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याशी चर्चा केली.त्यांनी या घटनेची सविस्तर माहिती घेऊन शिक्षण विभागाला योग्य त्या सूचना केल्या.त्यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पोलिस अधीक्षकांशीही संवाद साधून या प्रकरणी चर्चा केली.सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे यापूर्वी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.हे विशेष.स्ट्राँग रूमसारख्या ठिकाणी प्रश्नपत्रिका चोरीला जाणे म्हणजे सुरक्षा व्यवस्था किती कार्यतत्पर म्हणावे? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.पेपर फुटीमुळे नवीन पेपर निघणार की काय? शिक्षण विभाग काय भूमिका घेते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- Advertisement -

