- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-ईश्वराची किमया ही न्यारीच म्हणावी लागेल. पृथ्वी तलावावर पाठवणाराही तोच आणि त्याला वाटेल तेव्हा घेऊन जाणाराही तोच.मात्र,सर्वत्र आनंदाचे वातावरण असतांनाच नियतीने डाव साधला तर.. अनेकांचे काळीज फाटल्याशिवाय राहणार नाही.अशीच काळीज हेलावणारी घटना भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पिपरी जवळील कवडसी फाट्यानजीक गुरुवारच्या रात्री ८ वाजता घडली.अवघ्या दोन दिवसांवर लग्न येऊन ठेपलेले असतांनाच ३३ वर्षीय तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.दुर्गेश लांजेवार वय ३३ वर्षे,रा.आंबेडकर वॉर्ड,ता.जि.भंडारा असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.दुर्गेश हा तीन महिन्यांपूर्वीच एसटी महामंडळात बस चालक म्हणून रुजू झाला होता.काल शुक्रवारी मेहंदीचा कार्यक्रम तर उद्या,रविवार ११ जानेवारीला त्याचे गावातीलच एका तरुणीशी लग्न होणार असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते.अश्यातच तो घटनेच्या दिवशी म्हणजेच गुरुवारच्या रात्री काही कामानिमित्त कवडसी फाट्याजवळ गेला होता.पायवाटेने रस्ता ओलांडत असतांनाच भंडाराकडून नागपूरच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या एमएच १४ एलएक्स ४२१९ क्रमांकाच्या ट्रकने त्याला जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की दुर्गेशच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.क्षणात होत्याचे नव्हते झाले आणि दोन्ही कुटुंबियांच्या आनंदावर दुःखाचे सावट पसरले.अपघातानंतर काल शुक्रवारी दुर्गेशचे अंत्यसंस्कार पार पडले.प्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी अपघातातील ट्रक आणि चालकास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.घटनेचा पुढील तपास पीएसआय भिमाजी पाटील करीत आहेत.
- Advertisement -

