Tuesday, March 18, 2025
Homeचंद्रपूरनागरिकांनी बचत निधी कंपन्यांमध्ये गुंतवणुक करण्यापूर्वी दक्षता बाळगावी- लोढीया गोल्ड निधी लि.ब्रम्हपुरी,संपदा...
spot_img

नागरिकांनी बचत निधी कंपन्यांमध्ये गुंतवणुक करण्यापूर्वी दक्षता बाळगावी- लोढीया गोल्ड निधी लि.ब्रम्हपुरी,संपदा अर्बन निधी लि.मूल,येहोवा यीरे बचत निधी लि.चंद्रपूर अनधिकृत  

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- जिल्ह्यामध्ये गुंतवणुकदारांच्या रकमेची अफरातफर करून फसवणुक केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या.या पार्श्वभूमीवर निधी गुंतवणुक करणाऱ्या कंपन्यांमध्ये नागरिकांनी गुंतवणुक करू नये; असे आवाहन आर्थीक गुन्हे शाखेने केले आहे. जिल्ह्यातील तीन बचत कंपन्या अनधिकृत असल्याचे जाहीर केले आहे.काही निधी कंपन्यांनी किंवा परस्पर लाभ संस्थांनी कंपनी कायदा २०१३ कलम ४०६ नुसार व त्याखालील नियमानुसार एनडीएच – ४ अर्ज कार्पोरेट व्यवहार मंत्रालयास दाखल केले नाही.

त्यामुळे जिल्ह्यातील येहोवा यीरे बचत निधी लि. चंद्रपूर,संपदा अर्बन निधी लि.मूल व लोढीया गोल्ड निधी लि.ब्रह्मपुरी या तीन निधी कंपन्यां अनधिकृत आहेत.त्यामुळे कंपन्यांना कामकाज सुरू ठेवण्या पासून तसेच सदस्यांकडून निधी स्वीकारण्यापासून किंवा सर्वसाधारण जनतेला या कंपन्याचे सदस्य होण्यापासून प्रतिबंधित केले आहे.याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.असे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक शेखर देशमुख यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

क्रीडांगण मंजुरीसाठी शहरवासियांची एकजूट..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली येथील नगर पंचायतीच्या हद्दीतील योगी नारायण बाबा मठालगत सर्व्हे क्र.७९८ वरील मोकळ्या मैदानावर क्रीडांगण मंजूर करावे, या मागणीसाठी नागरिक व युवक-युवतींनी...

नक्षली संघटनेला मोठा हादरा; तब्बल १९ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण..

उद्रेक न्युज वृत्त :-हिंसक कारवाया,निष्पाप लोकांचे बळी,नाहक त्रास देणे,आदिवासींचे शोषण करणे तसेच अमानवीय विचारसरणीला झुगारून तब्बल १९ नक्षलवाद्यांनी आज सोमवारी छत्तीसगड राज्याच्या बिजापूरमध्ये पोलीस...

औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा घेऊन दोन गटांत हाणामारी; पोलिसांवर तुफान दगडफेक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-अधिवेशनात औरंगजेबाबद्दलचे वक्तव्य केल्या प्रकरणी नुकतेच समाजवादी पक्षाचे नेते तथा आमदार अबू आझमी यांना ५ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित...

आता घरकुलधारकांना १५ दिवसांत वाळू न मिळाल्यास तहसिलदारांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे.महत्वाचे म्हणजे अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडूनच घरचा आहेर दिला जात असल्याचा प्रकार हल्ली विधानसभेत निदर्शनास येऊ लागला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!