- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर नगर परिषदेच्या सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांच्या वागणुकीविरोधात एकत्र येत आज,मंगळवार ६ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांवर शिवीगाळ, निलंबनाच्या धमक्या,वेतन कपात,रजा नाकारणे,सुट्टीच्या दिवशी जबरदस्ती हजेरी,रात्री उशिरापर्यंत काम करून घेणे व मानसिक छळ केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.नगर परिषद कार्यालय हे नागरिकांच्या सेवेसाठी असते; मात्र सध्या तेच कार्यालय अंतर्गत संघर्षामुळे ठप्प झाल्याने “लोका सांगे ब्रम्हज्ञान अन् स्वतः कोरडे पाषाण” असे म्हणण्याची वेळ आली आहे.
चिमूर नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत.या मागण्यांबाबत वारंवार निवेदने सादर करूनही,मुख्याधिकारी कार्यालयाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला नाही.उलट, मागण्यांवर चर्चा न करता अपमानास्पद भाषेत बोलणे, आढावा बैठकीत अयोग्य शब्द वापरणे आणि कारवाईची भीती दाखवणे सुरू असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.विशेषतः कर वसुलीच्या आढावा बैठकीत, काही कर्मचाऱ्यांना वसुली कमी असल्याच्या कारणावरून वेतन रोखण्याची,एक महिन्याचा पगार कापण्याची,चौकशी लावण्याची आणि निलंबन करण्याची धमकी देण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.सुट्टीच्या दिवशीही हजर राहण्यास सांगणे,रजा मागितल्यास ती नाकारणे आणि कोणतीही पूर्वसूचना न देता बेकायदेशीर वेतन कपात करणे,यामुळे कर्मचाऱ्यांचा मानसिक तणाव प्रचंड वाढला असून कामाचे वातावरण भयग्रस्त झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
- Advertisement -

