उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- तालुक्यात काँग्रेसचे ‘हात से हात जोडो’ अभियानास सुरुवात झाली असून तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या कुरुड गावामध्ये काँगेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर अखिल भारतीय काँग्रेसने सुरू केलेल्या ‘हात से हात जोडो’ मोहिमेचे आज २२ मार्च २०२३ रोजी शुभारंभ आणि संपूर्ण गावात,घरोघरी,चौका-चौकात लोकांच्या भेटी घेत सदर अभियानाचे महत्व व इतर बाबी कुरुड येथील नागरिकांना पटवून देण्यात आले आहे.
‘हात से हात जोडो’ अभियाना प्रसंगी ‘नफरत छोडो भारत जोडो’ च्या घोषणा देत संपूर्ण गावात रॅली काढण्यात आली.अभियानात मोठ्या संख्येने गावातील नागरिकांनी सहभाग घेतला होता.काँग्रेसला साथ देऊन देशाला अंधाराच्या गर्दीतून प्रकाश वाटेवर घेऊन जाऊया आणि पुन्हा एकदा स्वर्णीम भारत घडवू; असे पत्रक नागरिकांना वितरित करण्यात आले.

‘हात से हात जोडो’अभियान निमित्ताने ओबीसी काँग्रेस जिल्हा सचिव मनोज ढोरे यांच्या नेतृत्वात देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले,देसाईगंज तालुका उपाध्यक्ष नितीन राऊत, विसोरा ग्रामपंचायत उपसरपंच संजय करंकर,पंकज चहांदे युवक तालुका अध्यक्ष,भीमराव नगराडे माजी नगरसेवक नगरपरिषद देसाईगंज,सुरेश मेश्राम माजी जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली,मनोहर निमजे तालुका महासचिव,सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभालवर,जगदीश शेंद्रे,ज्येष्ठ नेते नामदेव मिसार,युवा नेते अमर भर्रे,अशोक कुथे,सोमेश्वर दिवठे,भाऊराव चौधरी,माणिक बेद्रे,लक्ष्मीकांत शिलार,ज्ञानेश्वर ठाकरे, डाकराम भूर्रे,एकनाथ बुराडे,प्रभाकर ठाकरे,गणेश भोयर,रवींद्र कांबळी,गणपत बेदरे,दिनेश टेंभुर्ण काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने अभियानात सहभागी झाले होते.