Friday, April 17, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज आदर्श महाविद्यालयात पाच दिवस सुरक्षा रक्षक भरतीचे आयोजन.. -सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात पाच दिवस सुरक्षा रक्षक भरतीचे आयोजन.. -सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी लाभ घेण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली:-सूक्ष्म व लघु मंत्रालय भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत आणि भारत सरकारच्या पसारा ऍक्ट २००५ च्या नियमावलीनुसार स्थानिक तरुणांसाठी कायमस्वरूपी नोकरीसाठी आयएसओ (ISO)मान्यताप्राप्त शिवस्वराज्य सेक्युरिटी अँड मॅन पॉवर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि देसाईगंज नूतन शिक्षण प्रसारक मंडळ आदर्श कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,करिअर काउन्सलिंग आणि प्लेसमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार १५ एप्रिल ते १९ एप्रिल २०२५ पर्यंत एकूण ५ दिवस सुरक्षा रक्षक भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.भरती होणाऱ्या युवकांना परमानंट नोकरी दिली जाणार आहे.त्याचबरोबर सर्व सुविधा,ज्यामध्ये पी.एफ.सुविधा, मेडिकल,ग्रॅजुटी,पी.एफ.पेन्शन,विधवा पेन्शन,अनाथ पेन्शन व नियमानुसार भत्ते दिले जाईल,तसेच पेमेंट(वेतन) हे महाराष्ट्र गार्ड बोर्ड नियमाप्रमाणे दिले जाणार आहे. वेतन हे १५ हजार रुपयांपासून ते २३ हजार पर्यंत मिळेल व सर्व सूविधा दिल्या जातील.
               पात्रता👇
 युवक कमीत-कमी १० वी पास असावा,वय १८ ते ४० असावे,उंची १६७ सेंटिमीटर पेक्षा जास्त असावी, वजन ४८ किलो पेक्षा जास्त असावे तसेच युवक हा मेडिकल फिट असावा.
सदरची भरती प्रक्रिया ही येत्या,मंगळवार १५ एप्रिल   ते १९ एप्रिल २०२५ पर्यंत सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत देसाईगंज आदर्श कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे सुरू राहणार असल्याने सदर सुरक्षा रक्षक भरतीचा जास्तीत-जास्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी लाभ घ्यावा,असे आवाहन भरती अधिकारी महेश सरतापे व चंद्रशेखर सिंग यांनी केले आहे.
अधिक माहिती करिता संपर्क :-9552238057, 9569721640.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! कासवांची तस्करी करणाऱ्यांकडून धक्कादायक बाबी उघड.. – अघोरी पूजेचे अत्यंत किळसवाणे व्हिडिओ आणि चॅटिंग..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द उपक्षेत्राच्या नियतक्षेत्र शिर्शी बिटातील चिचडोह बॅरेजवरून हरंबा गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर कासवाची तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याची...

विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा; प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्य,रोजगार व उद्योजकता,नाविन्यता विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थी...

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!