Friday, April 17, 2026
Homeगडचिरोलीचार महिन्यांतच गुंडाळ-गांडाळ करून 'झकास ऐवजी भकास' कामे.. - कामाच्या ठिकाणी माहितीच्या...

चार महिन्यांतच गुंडाळ-गांडाळ करून ‘झकास ऐवजी भकास’ कामे.. – कामाच्या ठिकाणी माहितीच्या फलकांचा अभाव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यासह राज्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक वर्ष संपण्याच्या तीन ते चार महिन्यांच्या पूर्वीपासूनच विविध बांधकामांचा धूमधडाका सुरू केला जातो.शासकीय कामकाजात त्या वर्षातील १ एप्रिल ते ३१ मार्च हा आर्थिक वर्ष म्हणून गणला जातो.विशेषतः डिसेंबर,जानेवारी,फेब्रुवारी व आर्थिक वर्ष संपण्याचा शेवटचा महिना म्हणजे मार्च ‘एंडिंग’ या कालावधीतच गुंडाळ-गांडाळ करून ‘झकास ऐवजी भकास’ कामे करून शासनास कोट्यवधीची देयके (बील)सादर केली जातात.अशातच जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हा परिषद बांधकाम उपविभागात करण्यात येणाऱ्या बांधकामाच्या ठिकाणी कित्तेक कामा संदर्भात माहिती फलक लावण्यात येत नसल्याने नेमक्या कोणत्या शासकीय योजनेतील बांधकाम आहे? किती किंमतीचे आहे? हे सर्वसामान्य जनतेला कळत नाही.त्यातच रस्ते बांधकाम,नाली बांधकाम व इतर कामे करतांना प्रत्यक्ष कामात वापरण्यात येणारा सिमेंट वेगळाच तर देयक(बील) काढतांना जास्त दराच्या सिमेंटचे बीले जोडली जात आहेत.सदरची कामे निकृष्ट दर्जाचे व भ्रष्टाचाराला वाव देत असल्याने करण्यात येणाऱ्या कामांवर माहितीचे फलक लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
शासनाच्या विविध योजनेतून पायाभूत सुविधांसह विविध विकास कामे केली जातात.कामात पारदर्शकता असावी म्हणून कामाच्या तांत्रिक मान्यतेसह सामाजिक किंमत व यंत्रणेच्या नावासह माहिती फलक कामाच्या ठिकाणी लावले जाते.पण बांधकाम विभागामार्फत अनेक बांधकामे करून माहिती फलक न लावता बिलाची उचल करण्यात येत असल्याची ओरड सुरू आहे.फलक लावले नसल्याने कामात अनियमितता होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.कित्तेक कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट न देता कार्यालयातच बसून कामाचे मोजमाप करून बिल पास केले जात आहेत.बांधकाम विभागामार्फत गावस्तरावर विशेषतः सिमेंट-काँक्रीटचे  रस्ता व नाली बांधकाम मोठ्या प्रमाणावर केले जाते. मात्र ज्या ठिकाणी नाली,रस्ते सुस्थितीत आहेत,तेथे जुने बांधकाम जेसीबी मशीनच्या सहाय्याने पूर्णतः नष्ट करून दुरुस्तीच्या नावाखाली गरज नसतांना नवीन बांधकाम करण्यात येत आहेत.विशेष म्हणजे,ग्रामपंचायत तसेच लोकप्रतिनिधींकडून प्रस्ताव सादर करण्यात येतात. मात्र,ज्या ठिकाणी कामाची गरजही नाही,अश्याही ठिकाणी कामे आणून शहानिशा न करता अंदाजपत्रक तयार करून कामे केली जात असल्याने ही नवलाची बाब आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! कासवांची तस्करी करणाऱ्यांकडून धक्कादायक बाबी उघड.. – अघोरी पूजेचे अत्यंत किळसवाणे व्हिडिओ आणि चॅटिंग..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द उपक्षेत्राच्या नियतक्षेत्र शिर्शी बिटातील चिचडोह बॅरेजवरून हरंबा गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर कासवाची तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याची...

विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा; प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्य,रोजगार व उद्योजकता,नाविन्यता विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थी...

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!