Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीचार महिन्यांतच गुंडाळ-गांडाळ करून 'झकास ऐवजी भकास' कामे.. - कामाच्या ठिकाणी माहितीच्या...

चार महिन्यांतच गुंडाळ-गांडाळ करून ‘झकास ऐवजी भकास’ कामे.. – कामाच्या ठिकाणी माहितीच्या फलकांचा अभाव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यासह राज्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक वर्ष संपण्याच्या तीन ते चार महिन्यांच्या पूर्वीपासूनच विविध बांधकामांचा धूमधडाका सुरू केला जातो.शासकीय कामकाजात त्या वर्षातील १ एप्रिल ते ३१ मार्च हा आर्थिक वर्ष म्हणून गणला जातो.विशेषतः डिसेंबर,जानेवारी,फेब्रुवारी व आर्थिक वर्ष संपण्याचा शेवटचा महिना म्हणजे मार्च ‘एंडिंग’ या कालावधीतच गुंडाळ-गांडाळ करून ‘झकास ऐवजी भकास’ कामे करून शासनास कोट्यवधीची देयके (बील)सादर केली जातात.अशातच जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हा परिषद बांधकाम उपविभागात करण्यात येणाऱ्या बांधकामाच्या ठिकाणी कित्तेक कामा संदर्भात माहिती फलक लावण्यात येत नसल्याने नेमक्या कोणत्या शासकीय योजनेतील बांधकाम आहे? किती किंमतीचे आहे? हे सर्वसामान्य जनतेला कळत नाही.त्यातच रस्ते बांधकाम,नाली बांधकाम व इतर कामे करतांना प्रत्यक्ष कामात वापरण्यात येणारा सिमेंट वेगळाच तर देयक(बील) काढतांना जास्त दराच्या सिमेंटचे बीले जोडली जात आहेत.सदरची कामे निकृष्ट दर्जाचे व भ्रष्टाचाराला वाव देत असल्याने करण्यात येणाऱ्या कामांवर माहितीचे फलक लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
शासनाच्या विविध योजनेतून पायाभूत सुविधांसह विविध विकास कामे केली जातात.कामात पारदर्शकता असावी म्हणून कामाच्या तांत्रिक मान्यतेसह सामाजिक किंमत व यंत्रणेच्या नावासह माहिती फलक कामाच्या ठिकाणी लावले जाते.पण बांधकाम विभागामार्फत अनेक बांधकामे करून माहिती फलक न लावता बिलाची उचल करण्यात येत असल्याची ओरड सुरू आहे.फलक लावले नसल्याने कामात अनियमितता होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.कित्तेक कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट न देता कार्यालयातच बसून कामाचे मोजमाप करून बिल पास केले जात आहेत.बांधकाम विभागामार्फत गावस्तरावर विशेषतः सिमेंट-काँक्रीटचे  रस्ता व नाली बांधकाम मोठ्या प्रमाणावर केले जाते. मात्र ज्या ठिकाणी नाली,रस्ते सुस्थितीत आहेत,तेथे जुने बांधकाम जेसीबी मशीनच्या सहाय्याने पूर्णतः नष्ट करून दुरुस्तीच्या नावाखाली गरज नसतांना नवीन बांधकाम करण्यात येत आहेत.विशेष म्हणजे,ग्रामपंचायत तसेच लोकप्रतिनिधींकडून प्रस्ताव सादर करण्यात येतात. मात्र,ज्या ठिकाणी कामाची गरजही नाही,अश्याही ठिकाणी कामे आणून शहानिशा न करता अंदाजपत्रक तयार करून कामे केली जात असल्याने ही नवलाची बाब आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!