- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-ऐन धान कापणीच्या हंगामाला सुरुवात झाली असतांनाच जंगली हत्तींनी देसाईगंज तालुक्यात एंट्री केल्याने शेतकरी बांधव धास्तावले आहेत.अश्यातच जंगली हत्तींनी काल,शनिवार रात्रीच्या सुमारास विहीरगाव परिसरात हैदोस माजवून शेतकऱ्यांचे धानपीक व कृषी साहित्य पायदळी तुडवून मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त होऊन आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.जंगली हत्तींनी देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव,डोंगरगाव व पिंपळगाव परिसरात आपला मोर्चा वळविला आहे.त्यातच काल शनिवारी रात्रीच्या सुमारास जंगली हत्तींनी विहीरगाव येथील शेतकरी सिद्धार्थ सहारे व मधुकर निहाटे यांच्या शेतातील धानपीक पायदळी तुडवून विजेचे खांब,कृषी पंपाचे पाईप व इतर साहित्यांची तोडफोड केल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.वन विभागाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून जंगली हत्तींचा बंदोबस्त करावा व नुकसानभरपाई देण्यात यावी; अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
- Advertisement -

