Wednesday, April 15, 2026
Homeचंद्रपूर'त्या' नरभक्षक वाघाला वनविभागाने केले जेरबंद..

‘त्या’ नरभक्षक वाघाला वनविभागाने केले जेरबंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभिड तालुक्यातील मिंथुर गाव नजीकच्या शेतशिवारात मोहफुले वेचण्यासाठी गेलेला शेतमजूर वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना नुकतीच रविवार ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली होती.मिंथुर गावातील
रहिवासी शेतकरी हरिदास महादेव कुबडे वय ५८ वर्षे हे शेतपरिसरात मोहफुले वेचत असतांनाच वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवून ठार केले होते.त्यातच,परिसरात मागील काही दिवसांपासून वाघांच्या हालचालींमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.या पार्श्वभूमीवर वनविभागाने कारवाई करत एका नर वाघाला जेरबंद केले आहे.
नागभीड तालुक्यातील मिंथुर,बाळापुर आणि  आसपासच्या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाच वाघांचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ल्याच्या घटनाही समोर येत असल्याने वनविभाग सतर्क झाला होता.या पार्श्वभूमीवर तळोधी जवळील सावर्ला परिसरात वनविभागाच्या पथकाने सापळा रचत एका नर वाघाला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.वाघाला सुरक्षितरित्या पकडल्यानंतर त्याला नागभीड येथील वनविभागाच्या कार्यालयात नेण्यात आले.यानंतर पुढील प्रक्रियेसाठी वाघाला पिंजऱ्यासह नागपूर येथील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरकडे रवाना करण्यात आले.विशेष म्हणजे,परिसरात अजूनही चार वाघांचा वावर असल्याची माहिती असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.वाघांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी वन विभाग सज्ज झाला असून नागरिकांनी जंगल परिसरात जाऊ नये,असेही आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!