- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभिड तालुक्यातील मिंथुर गाव नजीकच्या शेतशिवारात मोहफुले वेचण्यासाठी गेलेला शेतमजूर वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना नुकतीच रविवार ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली होती.मिंथुर गावातील
रहिवासी शेतकरी हरिदास महादेव कुबडे वय ५८ वर्षे हे शेतपरिसरात मोहफुले वेचत असतांनाच वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवून ठार केले होते.त्यातच,परिसरात मागील काही दिवसांपासून वाघांच्या हालचालींमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.या पार्श्वभूमीवर वनविभागाने कारवाई करत एका नर वाघाला जेरबंद केले आहे.
नागभीड तालुक्यातील मिंथुर,बाळापुर आणि आसपासच्या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाच वाघांचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ल्याच्या घटनाही समोर येत असल्याने वनविभाग सतर्क झाला होता.या पार्श्वभूमीवर तळोधी जवळील सावर्ला परिसरात वनविभागाच्या पथकाने सापळा रचत एका नर वाघाला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.वाघाला सुरक्षितरित्या पकडल्यानंतर त्याला नागभीड येथील वनविभागाच्या कार्यालयात नेण्यात आले.यानंतर पुढील प्रक्रियेसाठी वाघाला पिंजऱ्यासह नागपूर येथील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरकडे रवाना करण्यात आले.विशेष म्हणजे,परिसरात अजूनही चार वाघांचा वावर असल्याची माहिती असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.वाघांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी वन विभाग सज्ज झाला असून नागरिकांनी जंगल परिसरात जाऊ नये,असेही आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisement -

