Monday, December 15, 2025
Homeचंद्रपूरचौघांचा ग्रामसेवकाशी झाला वाद; ग्रामसेवकास ग्रामपंचायतीत कोंडून चौघेही झाले पसार...- अखेर ११२ नंबर...

चौघांचा ग्रामसेवकाशी झाला वाद; ग्रामसेवकास ग्रामपंचायतीत कोंडून चौघेही झाले पसार…- अखेर ११२ नंबर डायल करून केली स्वतःची सुटका….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर(चिमूर) :- तालुक्यातील वाघोडा येथे ग्रामपंचायतीतर्फे खड्डे खोदकाम सुरू असतांना आरोपींनी खड्डे नसल्याचा आरोप करीत ग्रामसेवक संजय ठाकरे यांच्याशी वाद घातला.वाद इतके विकोपाला गेले की,आरोपींनी चक्क ग्रामसेवकालाच ग्रामपंचायतीत कोंडून पसार झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी वाघोडा येथे उघडकीस आली आहे.

सविस्तर वृत्त असे की,खड्डे खोदकाम सुरू असतांना कामावर सात मजुर कार्यरत होते.सदर कामाची देखरेख गावातील रोजगार सेवक रमेश गजभिये यांच्याकडे सोपविण्यात आली.त्यानुसार खड्डे खोदकाम सुरू होते.मात्र ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संजय ठाकरे कर्तव्य बजावित असतांना आरोपी राजू कावळे,प्रभाकर रणदिवे,उमेश मगरे व सुधाकर ढोक हे ग्रामपंचायतीत असणाऱ्या ग्रामसेवक यांच्याशी वाद घालू लागले व सदर कामावर खड्डे नसल्याचा आरोप  करू लागले.वाद घालीत असतांनाच क्षणाचाही विलंब न लावता ग्रामपंचायतीत असणाऱ्या ग्रामसेवक यांना आतमध्ये कोंडून चावी घेऊन चौघेही आरोपी पसार झाले.

ग्रामसेवक यांनी आरडा-ओरड केली.मात्र प्रतिसाद मिळाला नसल्याने अखेर ठाकरे यांनी ११२ नंबर डायल करून चिमूर पोलीस प्रशासनास कळविले असता पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन बंद असलेला दा कुलूप तोडून ग्रामसेवकाची कोंडून ठेवलेल्या खोलीतून सुटका केली व आरोपी राजू कावळे,प्रभाकर रणदिवे,उमेश मगरे व सुधाकर ढोक या चौघांवर सरकारी कर्मचाऱ्यांशी वाद घालणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेतीच्या एका ट्रकमुळे उचलबांगडी..! ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखाद्याची उचलबांगडी करायची झाली तर अनेकजण त्या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागत असतात.नाहीतर कितीतरी तक्रारी वा प्रकरणे आजही कार्यालयात धूळ खात...

आमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी बातमी वा वृत्त प्रसारित करतांना त्यातील तथ्य तसेच सत्यता तपासणे हे प्रत्येक पत्रकारांचे काम आहे.मात्र,काहीजण याचे उल्लंघन करून एखाद्याची नाहक...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी संधी..

उद्रेक न्युज वृत्त :-'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या...

किती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!