Monday, May 25, 2026
Homeचंद्रपूरचौघांचा ग्रामसेवकाशी झाला वाद; ग्रामसेवकास ग्रामपंचायतीत कोंडून चौघेही झाले पसार...- अखेर ११२ नंबर...

चौघांचा ग्रामसेवकाशी झाला वाद; ग्रामसेवकास ग्रामपंचायतीत कोंडून चौघेही झाले पसार…- अखेर ११२ नंबर डायल करून केली स्वतःची सुटका….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर(चिमूर) :- तालुक्यातील वाघोडा येथे ग्रामपंचायतीतर्फे खड्डे खोदकाम सुरू असतांना आरोपींनी खड्डे नसल्याचा आरोप करीत ग्रामसेवक संजय ठाकरे यांच्याशी वाद घातला.वाद इतके विकोपाला गेले की,आरोपींनी चक्क ग्रामसेवकालाच ग्रामपंचायतीत कोंडून पसार झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी वाघोडा येथे उघडकीस आली आहे.

सविस्तर वृत्त असे की,खड्डे खोदकाम सुरू असतांना कामावर सात मजुर कार्यरत होते.सदर कामाची देखरेख गावातील रोजगार सेवक रमेश गजभिये यांच्याकडे सोपविण्यात आली.त्यानुसार खड्डे खोदकाम सुरू होते.मात्र ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संजय ठाकरे कर्तव्य बजावित असतांना आरोपी राजू कावळे,प्रभाकर रणदिवे,उमेश मगरे व सुधाकर ढोक हे ग्रामपंचायतीत असणाऱ्या ग्रामसेवक यांच्याशी वाद घालू लागले व सदर कामावर खड्डे नसल्याचा आरोप  करू लागले.वाद घालीत असतांनाच क्षणाचाही विलंब न लावता ग्रामपंचायतीत असणाऱ्या ग्रामसेवक यांना आतमध्ये कोंडून चावी घेऊन चौघेही आरोपी पसार झाले.

ग्रामसेवक यांनी आरडा-ओरड केली.मात्र प्रतिसाद मिळाला नसल्याने अखेर ठाकरे यांनी ११२ नंबर डायल करून चिमूर पोलीस प्रशासनास कळविले असता पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन बंद असलेला दा कुलूप तोडून ग्रामसेवकाची कोंडून ठेवलेल्या खोलीतून सुटका केली व आरोपी राजू कावळे,प्रभाकर रणदिवे,उमेश मगरे व सुधाकर ढोक या चौघांवर सरकारी कर्मचाऱ्यांशी वाद घालणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!