- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
वर्धा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली.अश्यातच सायंकाळच्या सुमारास तिघेजण दुचाकीवरून जात असतांनाच चालत्या दुचाकीवर वीज पडून बापलेकाचा मृत्यू झाला,तर पुतण्या गंभीर जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास वर्धा-हिंगणघाट मार्गावरील धोत्रा चौरस्ता येथे घडली.भिवापूर येथील अनिल दत्तूजी ठाकरे हे त्यांचा १७ वर्षीय मुलगा वेदांत अनिल ठाकरे आणि पुतण्या सौरभ गजानन ठाकरे याच्यासोबत भर पावसात सोनेगाव मार्गाने आपल्या दुचाकीने भिवापूर येथून एका कार्यक्रमासाठी चारमंडळ गावाकडे जात होते.दरम्यान,धोत्रा चौरस्ता येथे येताच अचानकपणे विजांचा कडकडाट झाला आणि दुचाकीवर वीज पडली.यात वडील अनिल ठाकरे आणि मुलगा वेदांत ठाकरे हे जागीच ठार झाले.तर पुतण्या सौरभ ठाकरे हा गंभीर जखमी झाला.त्याला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.
दुसरी घटना ही भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सोदेपूर गावच्या शेतशिवरात घडली असून शेतात काम करत असतांनाच अंगावर वीज पडून एका ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली.यात रघुनाथ इसान उईके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
- Advertisement -

