Wednesday, June 10, 2026
Homeभंडाराखाजगी फायनान्स कंपनीने कर्जदाराच्या घराला ठोकले कुलूप.....! - मुलीच्या लग्नासाठी घेतले होते...

खाजगी फायनान्स कंपनीने कर्जदाराच्या घराला ठोकले कुलूप…..! – मुलीच्या लग्नासाठी घेतले होते कर्ज

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

भंडारा :- खासगी फायनान्स कंपनीकडून मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज परत करण्यास उशीर झाल्याने फायनान्स कंपनीने चक्क कर्जदाराच्या घराला कुलूप ठोकले. सदर प्रकार मोहाडी तालुक्यातील खडकी येथे मंगळवारी दुपारी घडला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. खासगी फायनान्स कंपन्या कर्जवसुलीसाठी कोणत्या स्तरावर जाऊ शकतात, याची प्रचीती खडकी येथे आली.

खडकी येथील बाबू गणपत वहिले यांनी मुलीच्या लग्नासाठी व व्यवसाय करण्यासाठी महिंद्रा फायनान्स कंपनीकडून पाच वर्षांपूर्वी तीन लाखांचे कर्ज घेतले होते. व्यवसाय बुडाल्याने आहे.कर्ज थकीत झाले. कर्ज फेडण्यास उशीर झाल्याने महिंद्रा फायनान्स कंपनीतील कर्मचाऱ्यांनी ही अत्यंत निष्ठुर कारवाई केली.कर्ज फेडण्यास आणखी मुदत देण्यात यावी, तसेच लावलेले कुलूप उघडण्यात यावे;अशी बाबू वहिले यांची विनंतीही धुडकावून लावण्यात आली.

कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या राहत्या घराला चक्क कुलूप ठोकून सील लावले.तसेच दरवाजावर नोटीस लावली.फायनान्स कंपन्या कर्ज देताना मोठे आमिष दाखवतात.मात्र कर्जाचा एक हप्ता थकला तरी घराला सील ठोकतात.याप्रकरणी कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!