Wednesday, April 15, 2026
Homeकुरखेडाकुरखेडा तालुक्याच्या चिखली येथील तरुणाच्या हत्येचा झाला उलगडा... - क्षुल्लक कारणावरून केली...

कुरखेडा तालुक्याच्या चिखली येथील तरुणाच्या हत्येचा झाला उलगडा… – क्षुल्लक कारणावरून केली हत्या…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा(गडचिरोली):-क्षुल्लक कारणावरून तिघा मित्रांनी मिळून कुरखेडा तालुक्याच्या चिखली येथील जितेश पगडवार या २८ वर्षीय तरुणाची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.शुक्रवारी,९ ऑगस्ट रोजी पहाटे चिखली-वडेगाव मार्गावर जितेश पगडवार तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.हत्या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवित अवघ्या काही तासांतच गावातीलच तीन तरुणांना अटक केली.मोबाइलच्या क्षुल्लक वादावरून हत्या केल्याची कबुली तिन्ही आरोपींनी कुरखेडा पोलिसांनी दिली.जितू ऊर्फ विशाल पिसोरे वय १९ वर्षे,वैभव सहारे वय १९ वर्षे,अमन पठाण वय २० वर्षे सर्व रा.चिखली अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार,तिन्ही आरोपी मित्र आहेत.आरोपी जितू ऊर्फ विशाल पिसोरे याचा मोबाइल काही दिवसांपूर्वी हरवला होता.हा मोबाइल जितेशनेच पळविला असेल,अशी आरोपीना शंका होती.यावरून मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. हा वाद विकोपाला गेल्याने वडेगाव रस्त्यावर गुरुवारी,दिनांक-८ ऑगस्टच्या रात्री १०.३० ते ११ वाजताच्या दरम्यान तिघांनीही जितेशच्या डोक्यावर लोखंडी सळाखीने वार करीत त्याची हत्या केली. शुक्रवारी दि.९ ऑगस्ट रोजी सदरची घटना उघडकीस येताच कुरखेडा पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपासाची चक्रे वेगाने फिरवित गावातील जितू,वैभव व अमन यांना त्याच दिवशी चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला तिघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र,पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३ (१), २३८,३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास ठाणेदार महेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!