Wednesday, June 10, 2026
Homeकुरखेडाकुरखेडा आम आदमी पक्षाच्या वतीने भव्य चक्का जाम आंदोलन- उद्योगा प्रमाणे शेतीलाही...

कुरखेडा आम आदमी पक्षाच्या वतीने भव्य चक्का जाम आंदोलन- उद्योगा प्रमाणे शेतीलाही २४ तास अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा :- शेतकरी बांधवांच्या शेतीला उद्योगांप्रमाणेच २४ तास वीज पुरवठा करण्यात यावा; या मागणीसाठी काल १५ मार्च २०२३ ला कुरखेडा आम आदमी पक्षाचा भव्य चक्का जाम आंदोलन गेवर्धा-गुरनोली फाट्यावर शांततेत करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाने उद्योगांप्रमाणे शेतीलाही २४ तास अखंडित वीज पुरवठा करावा व शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या विद्युत पुरवठ्यापासून मुक्त करावे.या मागणीसाठी आम आदमी पार्टी कुरखेडा च्या वतीने गेवर्धा-गुरनोली फाट्यावर भव्य चक्काजाम आंदोलन शेकडो शेतकऱ्यांच्या व आप कार्यकर्ते सहभागी होऊन कुरखेडा वडसा रस्त्यावर बसून जवळपास २ तास चक्काजाम आंदोलन शांततेत करण्यात आला.

शेती पंपा करिता दिला जाणारा ८ तासाचा विद्युत पुरवठा वाढवून १६ तास करावे.अन्यथा आम आदमी पार्टी  शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यांवर उत्तीरून तीव्र आंदोलन करेल; अशा प्रकारचे निवेदन सादर करून शासनास इशारा दिला होता.निवेदन सादर करुनही शासन स्तरावरून कोणत्याही प्रकारचे पाऊल शेतकऱ्यांच्या हितासाठी उचलण्यात न आल्याने आम आदमी पक्ष कुरखेडाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करून चक्का जाम करण्यात आले.

कूरखेडा तालुक्यात दिला जाणार कृषी विद्युत पुरवठा केवळ आठ तास दिला जात आहे.यामुळे उन्हाळी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची शेत पिके करपण्याच्या  स्थितीवर आहेत.सदर ८ तासाचा विद्युत पुरवठा १६ तास न केल्यास शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला समोर जावे लागणार आहे.यापूर्वी १२ तास विद्युत पुरवठा असल्याने शेतकऱ्यांनी दुबार पेरणीचे धाडस केले.परंतु मागील एक महिन्यांपासून कृषी जोडणी असलेल्या विद्युत पंपांना केवळ ८ तास वीज मिळत असल्यामुळे आवश्यकतेप्रमाणे शेतातील पिकांना पाणी देणे शक्य होत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक करपण्याची स्थितीत आले असून या विषयावर तात्काळ निर्णय घेऊन सदर वीज पुरवठा १६ तास न केल्यास शेतकरी पीक हातातून निघून जाईल यामुळे शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.उद्योग नसलेल्या जिल्हा व मागासलेली स्थिती असलेल्या या भागात शेती हे एकमेव रोजगाराचे साधन आहे.त्यातच वीजपुरवठा केवळ ८ तास झाल्यास शेती कशी पिकवायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा येऊन ठाकला आहे.

सदर अन्यायपूर्ण बाबीचा पुनर्विचार करावा व शेती करिता किमान १६ तास तरी वीज पुरवठा करण्यासाठी योग्य तो निर्णय घेण्यात यावा.आंदोलन स्थळी महावितरण कुरखेडा येथील उपविभागीय अभियंता मुरकुटे यांनी प्रत्यक्ष आंदोलन स्थळी भेट घेऊन चर्चा केली.जिल्हा प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार अनमदवार यांनी जबाबदारी पार पडली.पोलिस विभागाने आंदोलन स्थळी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला होता.ठाणेदार पोलिस निरीक्षक संदिप पाटील यांनी स्वतः आंदोलन स्थळी उपस्थित राहून सहकार्य केले.

सदर आंदोलनात बालकृष्ण सावसागडे जिल्हाध्यक्ष,भास्कर इंगळे जिल्हा सचिव,प्रकाश जीवानी जिल्हा उपाध्यक्ष,कुरखेडा ईश्वर ठाकूर तालुका संयोजक,ताहीर शेख तालुका सचिव,अनिकेत आकरे सह संयोजक,हिरा चौधरी जिल्हा कार्यकारिणी सदस्य, दीपक धारगाये सह संयोजक,पंकज डोंगरे सह संयोजक,अतूल सिंद्राम युवा सह सचिव,मुकेश नरोटे कोरची तालुकाध्यक्ष,भरत दहलानी तालुका संयोजक, आशिष गुटके वडसा शहराध्यक्ष,अमोल धाबेकर, गोकुळ यावरकर, तोहसीफ शेख,प्रकाश रक्षे,निलेश बसोना,चंद्रकिशोर बलोरे,विलास तीर्गम,सचिन मेश्राम, प्रदीप जनबंधू, दिलीप कुमोटी,रवींद्र मडावी,जगदीश रक्से, भास्कर मडावी कुमार नागदेवे, विनोद मेश्राम ,इसाक शेख,आशु राऊत,तबरेज खान,दीपक नागदेवे ,अतुल ठाकरे,चंदू ठाकरे,पवन तुमवार,नाजूक लुटे,सौरभ साखरे, शेखर बारापात्रे,शिल्पा बोरकर, सिद्धार्थ गणवीर,वामन पगारे,परवेज पठाण,प्रमोद दहिवले,आशिष कोवे, धम्मदीप राऊत, योगराज धमगाये,बाबुराव मडावी ,हिरा भाऊ उईके,विलास चव्हाण, युवराज साडील, परिसरातील शेतकरी सुनील किन्नाके जावेद शेख,जीवन पर्वते,स्वप्निल नागापुरे ,विकास पर्वते ,योगेश नखाते ,नामदेव नखाते ,बाळकृष्ण नखाते,वासुदेव बहेटवार,अनिल मचिरके, सुखदेव बुध्द,सोक सुखारे,दीपक सय्याम,भावेश कांबळे,दामोदर बाराई,रोशन टेभूर्ने,रोशन सय्यद, दिलीप कांबळे आदी मोठ्या संख्येने आप कार्यकर्ते उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!