- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-ग्रामविकास आणि ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण यासाठी विविध मागण्यांना घेऊन शुक्रवार,१६ ऑगस्टपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला आहे.या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी भंडारा जिल्ह्यातील १०० टक्के ग्रामपंचायती कुलूपबंद झाल्या आहेत. त्यामुळे कामकाज ठप्प पडले.दरम्यान,ग्रामपंचायतींचे अधिकार हनन करणाऱ्या शासन निर्णयाचा सरपंच, उपसरपंच यांनी निषेध केला.मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमध्ये शेकडो सरपंचांनी शुक्रवारी एकत्रित येऊन बीडीओंना कामबंद आंदोलन सुरू केल्याचे निवेदनातून अवगत केले आहे.सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्यांबरोबरच ग्रामसेवक,रोजगार सेवक,संगणक परिचालक,ग्रामपंचायत कर्मचारी अशा ग्रामपंचायतशी निगडित सर्वच संघटनांचा पाठिंबा असल्याने गावगाडा ठप्प पडला असून शासनाच्या अनेक योजनांच्या अंमलबजावणीवर विपरीत परिणाम पडला आहे.
मागण्या निकाली निघेपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याने कामाचा खोळंबा होणार आहे.यात मात्र जनसामान्यांची कामे प्रामुख्याने रखडणार आहेत.
प्रमुख मागण्या…👇
१.प्रधानमंत्री आवास योजनेची ‘ड’ यादी तात्काळ मंजूर
करण्यात यावी.
२.मोदी आवास योजनेचे पैसे तात्काळ मिळण्यात यावे.उर्वरित लाभार्थीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात यावी.
३.यशवंतराव चव्हाण,रमाई,शबरी या योजनेच्या मंजूर असलेल्या घरकुलांना पैसे तात्काळ देण्यात यावे.
४.यशवंतराव चव्हाण,अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेच्या नवीन प्रस्तावांना त्वरित मंजुरी देण्यात यावी.
५.शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलांना ३ लाख रुपये निधी देण्यात यावा.
६.रोजगार हमी योजनेचे कुशल,अकुशल कामाचे पैसे तात्काळ देण्यात यावे.
७.उच्च न्यायालयाने रद्द केलेले २५ लाखांपर्यंतचे काम करण्याचे ग्रामपंचायतीचे अधिकार याबाबत शासनाने सुप्रीम कोर्टातून ‘स्टे’आणावे.
८.सरपंच,उपसरपंच,सदस्य यांना सन्मानपूर्वक मानधन देण्यात यावे.
९.ग्रामपंचायत अंतर्गत गावठाण क्षेत्र वाढवण्यात यावे.
अशा विविध मागण्यांना घेऊन राज्यव्यापी कामबंद आंदोलन प्रारंभ करण्यात आले आहे.
- Advertisement -

