- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
एटापल्ली(गडचिरोली):-आईवडिलांसोबत शेतात कामासाठी गेलेला मुलगा हातपाय धुण्यासाठी विहिरीवर गेला व पाय घसरून विहिरीत पडल्याने बुडून मृत्युमुखी पडला.ही घटना १५ ऑगस्ट रोजी एटापल्ली तालुक्यातील डुम्मे गावात घडली.निखिल सदाशिव दुर्वा वय १७ वर्षे असे मृत मुलाचे नाव आहे.तो दहावी उत्तीर्ण आहे.डुम्मे गावात आईवडील व भावासमवेत तो राहायचा.१५ ऑगस्टला स्वतःच्या शेतात धान रोवणीचे काम सुरू होते.त्यासाठी तो गेला होता.दुपारी २ वाजता जेवणाची वेळ झाली.हातपाय धुण्यासाठी निखिल हा विहिरीवर गेला,यावेळी पाय घसरून तो विहिरीत पडला.पोहता येत नसल्याने नाकातोंडात पाणी जाऊन त्याचा मृत्यू झाला. बराचवेळ होऊनही निखिल न आल्याने आई विहिरीजवळ गेली असता तिला त्याची चप्पल विहिरीजवळ दिसली.विहिरीत डोकावून पाहिले असता मुलगा पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने आईने टाहो फोडीत आरडाओरड केली व सदर घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली.
- Advertisement -

