Wednesday, June 24, 2026
Homeएटापल्लीतब्बल १ कोटी ३७ लाख रूपयांचा धान घोटाळा उघड-गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील घटना…

तब्बल १ कोटी ३७ लाख रूपयांचा धान घोटाळा उघड-गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

एटापल्ली(गडचिरोली) :- तालुक्यातील हेडरी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेत पणन हंगाम २०२२-२३ मध्ये धान खरेदी केलेल्या व्यवहारात तब्बल १ कोटी ३७ लाख रूपयांच्या धानाची तफावत आढळली.धानाच्या अफरातफर प्रकरणी सखोल चौकशीअंती आविका संस्थेचे अध्यक्ष,सचिव तसेच आदिवासी विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसह एकूण पाच जणांवर गुरुवारी आलदंडी पोलिस मदत केंद्रात गुन्हा दाखल करण्यात आला.

खरीप पणन हंगाम २०२२-२३ मध्ये हेडरी धान खरेदी केंद्रावर ६७१५.३३ क्विंटल म्हणजेच १२ हजार ९९८ पोती धानाचा साठा कमी आढळला.२०२४ रूपये प्रति क्विटल दराने १ कोटी ३६ लाख ९९ हजार १७३ रूपये २० पैसे,तसेच बारदान्याचे ४ लाख २५ हजार ८१४ रूपये ४८ पैसे,असे एकूण १ कोटी ३७ लाख २५ हजार ८७ रूपये ६८ पैसे एवढी तफावत आढळली. धानाच्या अफरातफर प्रकरणी १२ जानेवारीला आदिवासी विकास महामंडळ अहेरीचे उपप्रादेशिक व्यवस्थापक (उच्च श्रेणी) बी.एस.बरकमकर यांनी आलदंडी पोलिसांत तक्रार दिली.त्यानुसार आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुधाकर सुकू पुंगाटी,सचिव किशोर पदा,केंद्र प्रमुख सुरेश पुंगाटी,मदतनीस प्रदीप दुर्गे तसेच आदिवासी विकास महामंडळ कार्यालय अहेरीच्या प्रभारी विपणन निरीक्षक सोनाली पेंदाम यांच्याविरोधात तक्रार दिली. तक्रारीवरून पाचही आरोपींविरोधात भादंवि कलम ४०६,४०९,४२०,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!