Tuesday, April 21, 2026
Homeमुंबईआदिवासी कुटुंबांचे उत्पन्न वाढ व जीवनमान उंचावण्यासाठी ‘मॉयल लिमिटेड’ च्या महत्वपूर्ण योगदानातून...

आदिवासी कुटुंबांचे उत्पन्न वाढ व जीवनमान उंचावण्यासाठी ‘मॉयल लिमिटेड’ च्या महत्वपूर्ण योगदानातून अनेक उपक्रम- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -गडचिरोली,नागपूर व भंडारा जिल्ह्यांमध्ये वैविध्यपूर्ण विकास प्रकल्प..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई/गडचिरोली :- “आदिवासी समुदायाचे जीवनमान उंचावणे व त्यांच्या जीवनात शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्राचा सहभाग आहे.यातून कृषी आधारित वैविध्यपूर्ण योजना राबवल्या जात असून या विकासासाठी ‘मॉयल लिमिटेड’ चे योगदान महत्वपूर्ण आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.केंद्र सरकारच्या अंगीकृत मिनीरत्न ‘मॉयल लिमिटेड’ या सार्वजनिक उपक्रमाच्या वतीने विविध जिल्ह्यांमधील आदिवासी कुटुंबांचे उत्पन्न वाढ व जीवनमान उंचावण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत.मुख्यमंत्री फडणवीस यांनी या योगदानासाठी ‘मॉयल लिमिटेड’ चे अभिनंदन केले. “नीती आयोगाने (NITI Aayog) देशातील निवडक आकांक्षी जिल्ह्यांमध्ये गडचिरोलीचा समावेश केला आहे.स्वयंसेवी संस्थाचा सहभाग व ‘मॉयल लिमिटेड’ च्या योगदानातून विविध जिल्ह्यातील आदिवासी समुदायासाठी शाश्वत परिणामकारक उपाययोजना राबविण्यात येतील.यात सहभागी सामाजिक क्षेत्रातील जलसंवर्धन,कृषी व वन आधारित उपजीविका या क्षेत्रात बायफ संस्थेचे विकासात्मक दीर्घकालीन कार्य चांगले आहे,”असे याप्रसंगी त्यांनी नमूद केले.
‘मॉयल लिमिटेड’ने आदिवासी क्षेत्रातील सामाजिक कामासाठी “बायफ इन्स्टिटयूट फॉर सस्टेनेबल लाइव्हवूड्स अँड  डेव्हलपमेंट (बीआयएसएलडी )” स्वयंसेवी संस्थेची निवड करत निधी उपलब्ध करून दिला आहे.ही संस्था राबवत असलेल्या उपक्रमांतून गडचिरोली जिल्ह्यातील १८ हजार कुटुंबांना आधार देण्यासाठी उपजीविकेशी संबंधित विविध उपक्रम राबवले जात आहेत.या उपक्रमांमुळे अनेक ग्रामीण कुटुंबांसाठी शाश्वत उपजीविका आणि जीवनमानात सुधार होईल.तसेच ‘मॉयल लिमिटेड’ या सार्वजनिक उपक्रमाकडून मंजूर निधीतून मार्च २०२८ पर्यंत नागपूर व भंडारा जिल्ह्यातील ४ हजार कुटुंबांच्या उत्पन्न वाढीसाठी व जीवनमान उंचावण्यासाठी  विविध योजना राबवल्या जाणार आहेत,पारंपरिक बोडी-आधारित शेती प्रणाली,जलसंपदा विकास आणि महिला सक्षमीकरण कार्यक्रमांचे एकत्रीकरण करून समुदाय-आधारित उपजीविकेला प्रोत्साहन दिले जात आहेत,असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांना या उपक्रमांसंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली.याबरोबर शासनाचे विविध विभाग व  स्वयंसेवी संस्थामार्फत संयुक्त सहकार्याने जिल्ह्यात कृषी,वन उत्पादने,ग्रामीण उत्पादने,पायाभूत सुविधा व व्यवस्थापन सुविधा यांचा विकास साधला जाणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत ३ हजारापेक्षा अधिकच्या रुग्णालयांचे जाळे; आज ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचे आज, मंगळवार २१ एप्रिल रोजी लोकार्पण करण्यात आले.यात राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या...

आंघोळ करून शाळेचा गणवेश परिधान करणार! तेवढ्यातच कोसळला खाली.. – शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा वसुमना पंत यांनी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू करून सकाळी ११...

आता पोलिसांनाही हेल्मेटची सक्ती.. – विना हेल्मेट फोटो वा व्हिडीओ व्हायरल झाल्यास घेतली जाणार गंभीर दखल..

उद्रेक न्युज वृत्त :-कोणतेही नियम वा एखाद्या कायद्याची सक्ती ही सर्वप्रथम सर्वसामान्य नागरिकांसाठी लागू करण्यात येते.मात्र,जे नियम वा सक्ती तुम्ही दुसऱ्यांना सांगता त्याच्या अंमलबजावणीची...

दिव्यांगांनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करुन एकाच छताखाली विविध शासकिय योजनांचा लाभ घ्यावा.. -देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण, पुनर्वसन व सक्षमीकरणासाठी स्वतंत्रपणे कार्य करण्याच्या उद्देशाने दिव्यांग कल्याण विभागाची स्थापना १५ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आली.स्वतंत्र विभाग स्थापन...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!