- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल उचलत आता महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांचे सुरक्षा ऑडिट केले जाणार असल्याचे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी एका उच्चस्तरीय बैठकीत बोलतांना स्पष्ट केले.विशेष म्हणजे,काल शुक्रवारी राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील पिपलोडी गावात सकाळच्या सुमारास शाळेत प्रार्थना सुरू असतांनाच शाळेच्या इमारतीचे छत अचानक कोसळल्याने शाळेतील सात मुलांचा मृत्यू झाला होता.या पार्श्वभूमीवर,महाराष्ट्र सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कंबर कसली आहे.
बैठकीत राज्यातील सर्व सरकारी शाळांचे सुरक्षा ऑडिट करण्याचे व धोकादायक इमारतींना तातडीने निधी देण्याचे निर्देश दिले आहेत.राजस्थानमधील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली.राज्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या इमारतींच्या सद्यस्थितीचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.राजस्थानसारखी दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घडू नये,यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले.
- Advertisement -

