Sunday, May 17, 2026
Homeनवी दिल्लीआता मोफत तांदूळ ऐवजी मिळणार जीवनावश्यक वस्तू... -केंद्र सरकारचा निर्णय...

आता मोफत तांदूळ ऐवजी मिळणार जीवनावश्यक वस्तू… -केंद्र सरकारचा निर्णय…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नवी दिल्ली :-केंद्र सरकार देशातील गरजूंना रेशनकार्डद्वारे मोफत रेशन देते.यामध्ये शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ दिला जातो; मात्र त्यात मोठा बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.मोफत तांदूळ देण्याऐवजी आता इतर ९ वस्तू देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात.यातील बहुतांश योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत.रेशन कार्डधारकांना मोफत रेशन योजनेंतर्गत रेशनही पुरविले जाते.मोफत रेशन योजनेअंतर्गत जवळपास ९० कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते.यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता.मात्र आता यात बदल करण्यात आला आहे.
त्यानुसार रेशनवरील मोफत तांदूळ बंद करण्यात येणार आहे.त्याऐवजी इतर ९ जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत.यामध्ये गहू,डाळी,हरभरा,साखर,मीठ,मोहरीचे तेल,मैदा,सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे.लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढविण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.यामुळे लोकांचे जीवनमानही सुधारेल,अशी आशा सरकारला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भाजप नेत्याच्या मुलाचा मृतदेह आढळला तलावात; परिसरात तणावपूर्ण वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-खापरखेडा-नांदा मार्गावरील तलावात भाजप नेते रमेश लोढे यांच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.सचिन रमेश लोढे वय ३७ वर्षे,रा.वॉर्ड...

वाढत्या महागाईने सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम..

उद्रेक न्युज वृत्त :-वाढत्या महागाईने पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम केला आहे. युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम स्पष्टपणे दिसू लागला आहे.घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीपासून...

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली; परीक्षार्थींसाठी सुधारित वेळापत्रक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा-टिईटी-२०२६ परीक्षा आता येत्या,रविवार २८ जून २०२६ रोजी होणार...

ठाणेगाव परिसरात वणव्याचे रौद्ररूप; शेतकऱ्यांच्या डोळ्यात दुःखाश्रू.. – आमदार रामदास मसराम शेतबांधावर..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव परिसराच्या शेतशिवारात काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे लागलेल्या वणव्याने रौद्ररूप धारण करून परिसरातील शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.काहींनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!