- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा(देसाईगंज):-कोंढाळा शेतशिवार नजीकच्या जंगल परिसरात गुरे चराईसाठी नेलेल्या कळपातील गोऱ्याला वन विभागाच्या कक्ष क्रमांक- ८०८ मध्ये वाघाने ठार केल्याची घटना आज,३१ ऑगस्टला सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
आज सकाळच्या सुमारास गावातील गुराख्याने कोंढाळा-रवी(रई)मार्गावरील शेतशिवार नजीकच्या जंगल परिसरात गुरे-ढोरे चराईसाठी नेली होती.गुरे- ढोरे चराई करीत असतांना दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानक कळपावर हल्ला चढवला.हल्ला चढवताच ढोरे सैरावैरा पळू लागले.मात्र,गावातील शेतकरी यशवंत बिसन बुराडे यांच्या मालकीच्या असलेल्या गायीचे वासरू(गोरा)यांस वडसा वन विभागाअंतर्गत येणाऱ्या कोंढाळा जंगल परिसरातील कक्ष क्रमांक-८०८ मध्ये वाघाने हल्ला चढवून ठार केले.वाघाने गोऱ्याला ठार केल्याची माहिती गावातील वास्तव्यास असणाऱ्या महिला वनरक्षक निलिमा सेलोटे यांस देण्यात आली.लगेच सेलोटे यांनी वन क्षेत्रसहाय्यक के.वाय.कऱ्हाडे यांना सदर घटनेबाबत कळविले.वन क्षेत्रसहाय्यक व वनरक्षक यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला.पंचनामा करतेवेळी गावातील अरुण दुपारे,गुरुदेव ठाकरे,जयानंद बुल्ले,राजेंद्र शेंडे व देवनाथ तुपट सह शेतकरी यशवंत बुराडे उपस्थित होते.वाघाने गोऱ्याला ठार केल्याप्रकरणी शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.करीता वन विभागाकडून लवकरात-लवकर नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी यशवंत बुराडे यांनी केली आहे.
- Advertisement -

