Friday, November 7, 2025
Homeपुणेअसेही एक गाव,विधवा महिलांच्या बांगड्या न फोडण्याचा ग्रामसभेतच घेतला ठराव...!- २६ जानेवारीला...

असेही एक गाव,विधवा महिलांच्या बांगड्या न फोडण्याचा ग्रामसभेतच घेतला ठराव…!- २६ जानेवारीला घेतला निर्णय

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

पुणे :-आपल्या आजूबाजूला अशा काही चांगल्या घटना घडत असतात की ज्यामुळे समाजामध्ये एक सकारात्मकता येऊ लागते.असाच एक आदर्शवत निर्णय आंबेगाव तालुक्यातील आदर्शगाव गावडेवाडी गावाने घेतला आहे. या गावाने पतीच्या निधनानंतर बांगड्या न फोडण्याचा ठरावच ग्रामसभेत मंजूर केला. याला प्रोत्साहन देण्यासाठी या गावतील महिलांनी २५ विधवा महिलांची खणा-नारळने ओटी भरून आदर्श निर्माण केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल अशी घोषणाच या गावचे सरपंच स्वरुपा गावडे यांनी केली आहे.

समाजात विधवांबद्दलची बदलत चाललेली मानसिकता ही एका सकारात्मक विचारांची नांदी आहे. समाजातील विधवा प्रथा संपुष्टात आणण्यासाठी २५ विधवा महिलांची खणा-नारळाने ओटी भरण्यात आली. प्रजासत्ताक दिनी घेण्यात आलेल्या बांगड्या न फोडण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक वर्षानंतर कपाळावर हळद-कुंकू लाऊन मिळालेल्या सन्मानाने महिलांचा चेहेऱ्यावरचा आनंद द्विगुणीत करणारा होता. यापुढे संबंधित महिलांच्या हस्तेच अनेक शुभ कार्य करण्याचे देखील ठरवण्यात आले आहे. या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल अशी घोषणा सरपंच स्वरूपा ऋषिकेश गावडे यांनी केली. त्यांच्या या निर्णयाचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या सरपंच स्वरूपा गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. या ग्रामसभेला ग्रामसेविका दिपाली थोरात, उपसरपंच योगिता गावडे, मुख्याध्यापिका शशिकला चिखले, सदस्या मंदा गावडे, प्रियांका गावडे, मंगल गावडे, स्नेहल गावडे, ज्योती गायकवाड, मीना सोपानराव निघोट उपस्थित होत्या. या ऐतिहासिक निर्णयाने विधवा महिला तर भारावून गेल्याच पण समाजामध्ये देखील एक सकारात्मक निर्णय झाल्याची भावना पहायला मिळाली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल १ हजार ९७२ शाळांमध्ये निनादले ‘वंदे मातरम्’ चे सूर अन् देशभक्तीची लहर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा असलेल्या “वंदे मातरम्” या गीताला आज १५० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात देशभक्तीचा उत्साह अनुभवायला मिळाला.जिल्ह्यातील सर्व...

ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला ‘दे धक्का’.. – आजच पक्ष प्रवेश अन् आजच नगराध्यक्ष पदाची उमेदवारीही घोषित..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वप्रथम नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२...

आज सोने-चांदीच्या दरात घसरण; पण अजूनही लाख मोलाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-सोन्या-चांदीचे दर हे दिवसातून दोनदा जारी करण्यात येतात.त्यामुळे दुपारी वाढलेला भाव पटकन सायंकाळच्या सुमारास कमी-अधिक प्रमाणात झालेला दिसून येत असल्याने अनेकजण...

देसाईगंज येथे वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारताच्या स्वातंत्र्य काळात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या बंकिमचंद्र चटर्जी लिखित गीत 'वंदे मातरम' ला आज,शुक्रवार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!