Wednesday, June 10, 2026
Homeचंद्रपूरअज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोघांचा घटनास्थळीच मृत्यू..

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोघांचा घटनास्थळीच मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना आज,सोमवार ११ मे रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील शंकरपूर-भिसी राज्य महामार्गावरील आसोला बसस्थानक नजीक घडली.अमोल अरुण नन्नावरे वय ३० वर्षे,रा.शेगाव खुर्द,ता.भद्रावती व विकास दादाजी जांभुळे वय ३७ वर्षे,रा.टिटवी, ता.चिमूर असे अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत.
अमोल व विकास हे दोघेही त्यांच्या एमएच ३४ बीए ८०९५ क्रमांकाच्या दुचाकीने टिटवीकडे जात असतांना आसोला बसस्थानकाजवळ मागेहून भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.अपघातात दोघांच्याही डोक्याला गंभीर मार लागल्याने दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.अपघात घडताच अज्ञात वाहन चालक वाहनासह पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी चिमूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!