- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने वापरकर्त्यांना सिम कार्ड बंद करण्याच्या नावाने होणाऱ्या मोठ्या फसवणूकीबद्दल सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.असे मोठे फ्रॉड करणारे लोकांना फसवून त्यांची वैयक्तिक माहिती मिळवण्यासाठी भीती दाखवण्यासाठी नवे डावपेच वापरत आहेत.

ट्राईच्या नावाने बनावट संदेश पाठवून लोकांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे.या संदेशांमध्ये ट्राईकडून पाठवले असल्याचा दावा केला जातो आणि तुमचे सिम कार्ड बंद होण्याची भीती दाखवून तुमची वैयक्तिक माहिती काढण्याचा प्रयत्न केला जातो.या फसव्या संदेशांमध्ये तुमच्या आधार क्रमांकासह वैयक्तिक माहिती काढण्यासाठी kyc अपडेट करण्याची बनावट कारणे दिली जातात.
इतकेच नव्हे तर काही फसव्या संदेशांमध्ये kyc अपडेट करण्यासाठी कागदपत्रे जमा करण्याची विनंती केली जाते आणि ते जमा न केल्यास तुमचा नंबर बंद होईल; अशी धमकी दिली जाते.अशा भीतीमुळे अनेक वापरकर्ते आपली वैयक्तिक माहिती देऊन फसतात आणि त्यांना लुटले जाते.ट्राईने अशा संदेशांना व फोन कॉल्सना बनावट असल्याचे
स्पष्ट केले आहे आणि वापरकर्त्यांना फसवणूक
करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकू नये; यासाठी वरील अलर्ट दिला आहे.सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रमाण पाहता TRAI ने अशा संदेशांकडे आणि फोन कॉल्सकडे लक्ष न देण्याचा आणि त्या संबंधित दूरसंचार सेवा दात्याच्या ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क करून तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला
आहे.शिवाय,केंद्र सरकारच्या संचार साथी (चक्षु)
पोर्टलवर अशा संदेशांची तक्रार करता येते.
- Advertisement -

