Sunday, July 12, 2026
Homeकुरखेडासमस्येकडे वारंवार दुर्लक्ष केल्याने संतप्त गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप…-कुरखेडा तालुक्यातील घटना…

समस्येकडे वारंवार दुर्लक्ष केल्याने संतप्त गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप…-कुरखेडा तालुक्यातील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा(गडचिरोली) :- दोन वर्षांपासून रखडलेल्या पाणी पुरवठा नळ योजनेचा बांधकामावेळी वार्ड क्र.१ मधील नालीची मोडतोड होत येथून सांड पाणी व पावसाच्या पाण्याचा निचरा होणे कठीण झाले आहे. याकडे वारंवार लक्ष वेधूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत संतप्त ग्रामसभेने काल,दिनांक-२५ जून रोजी घाटी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.

मागील दोन वर्षांपासून नळ योजनेचे हे काम सुरू आहे.बांधकामा दरम्यान तुटलेल्या नालीच्या बांधकामाकडे दुर्लक्ष झाल्याने या वार्डात ठिकठिकाणी सांडपाणी साचत दुर्गंधी निर्माण झाली आहे. पावसाळ्यात तर परीस्थीती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.या समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासन व पंचायत समिति मार्फत अनेकदा संबंधित कंत्राटदार व पाणी पुरवठा विभागाचे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र,याकडे सातत्याने दूर्लक्ष होत असल्याने संतप्त ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकत निषेध व्यक्त केला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात ‘किलकारी’ उपक्रमात वर्धा पहिल्या,चंद्रपूर दुसऱ्या,वाशीम तिसऱ्या तर गडचिरोली चौथ्या स्थानावर..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत गरोदर माता,माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी डिजिटल साक्षरता व जनजागृती करणाऱ्या ‘किलकारी’(Kilkari Mobile Audio Services)उपक्रमात...

वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी; वाघाची पाठीमागून झडप..

उद्रेक न्युज वृत्त  नागभीड(चंद्रपूर):-गावाजवळच्या परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने प्राणघातक हल्ला चढवून गुराख्यास गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना आज,रविवार १२ जुलै रोजी दुपारी...

आता कळलेय भावा? अवैध दारू बंद कां होत नाही तर.. – दारू पुरवठा करणाऱ्यांना मिळतोय ठेका; वाचा संपूर्ण करून कहाणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून दारू बंदीचा धिंडोरा पिटण्यात येत आहे.पण, खरोखरच दारू बंद झाली काय?आज कित्येक गावांमध्ये देशी,विदेशी, गावठी मोहफुलाची दारू व थंडगार...

प्रशासकांच्या आर्थिक अधिकारांवर मर्यादा; ग्रामीण अर्थचक्र मंदावले.. – ग्रामपंचायत निवडणुका पुढल्याच वर्षी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत चालवा,यासाठी सरकारने माजी सरपंच आणि सदस्य यांची प्रशासकीय समिती म्हणून नेमणूक केली आहे.त्यानुसार,माजी सरपंच...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!