- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-शेतातील वांगे तोडतांना काटा रुतल्याचे समजून कामाला लागली.पण,काही वेळाने अस्वस्थामुळे घरी परतली.प्रकृती जास्तच खालावल्याने रुग्णालयात हलवले तिथे प्राथमिक उपचारानंतर नागपूरला रेफर करतांना वाटेतच तिला मृत्यूने जवळ केले असल्याची दुर्दैवी घटना नुकतीच दोन दिवसांपूर्वी भिवापूर येथे घडली.४४ वर्षीय रेखा धनराज नंदरधने रा.माळीपुरा, भिवापूर असे सर्प दंशाने मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे.
माहितीनुसार,भिवापूर शहरात रेखा या भाजीपाला विक्रीचे काम करत होत्या.लगतच्या रानाई तलाव मार्गावर त्यांचे शेत आहे.यात त्यांनी विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड केली आहे.त्या नेहमीप्रमाणे शेतात गेल्या.वांगे तोडत असतांना झाडात दडून बसलेल्या विषारी सापाने त्यांच्या हाताच्या बोटाला दंश केला.मात्र,साप नजरेस न आल्याने रेखा यांनी
काटा रुतल्याचा समज करून भाजीपाला वांगे तोडण्याचे काम सुरूच ठेवले.तासाभरानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने त्या घरी परतल्या.अस्वस्थता वाढल्यामुळे त्यांना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.तेथील डॉक्टरांनी सर्पदंशाचे निदान केल्याने नागपूरला रेफर करण्यात आले.नागपूरच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.आता खरिपाचा हंगाम आणि पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्पदंशाच्या घटना वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.
- Advertisement -

