- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-सुरुवातीला दोघांची चांगली मैत्री होती.मैत्रीण सुशिक्षित असून अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती.काही कालावधीत मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.त्यानंतर,२५ वर्षीय तरुणाने लग्नाचे वचन देत लैंगिक संबंध प्रस्थापित केले.लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणीने बलात्काराच्या गुन्ह्यात फसवले होते, पण तरुणाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतल्याने तो या गंभीर प्रकरणातून बचावला आहे.उच्च न्यायालयाने रेकॉर्डवरील विविध बाबी लक्षात घेता बलात्कारासह इतर संबंधित गुन्ह्यांचा वादग्रस्त एफआयआर व खटला रद्द केला आहे. सोलेमानराजू चोलांगी वय २५ वर्षे,असे तरुणाचे नाव असून तो नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यातील कोडामेंढी येथील रहिवासी आहे.त्याची प्रेयसी अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती.तिने सोलेमानराजूविरोधात ५ एप्रिल २०२२ रोजी रामटेक पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.मैत्रीण व सोलेमानराजू २०२२ पासून सतत संपर्कात होते व यांचे एकमेकांवर प्रेम होते.सोलेमानराजूने लग्न करण्याचे वचन देऊन २८ ऑगस्ट २०२० रोजी पहिल्यांदा तरुणीवर बलात्कार केला.त्यानंतरही त्याने तिच्यासोबत वारंवार शरीरसंबंध ठेवले व पुढे चालून तरुणीला टाळणे सुरू केले आणि लग्न करण्यास नकार दिला,असा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.पोलिसांनी त्याची दखल घेऊन वादग्रस्त एफआयआर नोंदवला होता.१६ मे २०२२ रोजी जिल्हा सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता.त्याविरुद्ध सोलेमानराजूने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.त्यावर न्यायमूर्तिद्वय उर्मिला जोशी-फलके व नंदेश देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.यात तरुणा विरोधात ठोस पुरावे आढळून आले नसल्याने व उलट तरुणी त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत असल्याचे स्पष्ट झाल्याने बलात्कारासह खटला रद्द करण्यात आला.
सोलेमानराजूतर्फे ॲड.राजू कडू व ॲड.विकास गडपायले यांनी कामकाज पाहिले.
- Advertisement -

