Wednesday, April 29, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तराहुल गांधी पंतप्रधान झाले,तर ते कहरच करतील; असे म्हणताच न्यायालयाने याचिकाकर्त्यालाच ...

राहुल गांधी पंतप्रधान झाले,तर ते कहरच करतील; असे म्हणताच न्यायालयाने याचिकाकर्त्यालाच फटकारले..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पंकज कुमुदचंद्रा फडणीस यांनी राहुल गांधीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती.पंकज फडणीस
 हे अभिनव भारत काँग्रेस या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.राहुल गांधी यांच्याकडून वीर सावरकरांबद्दल केल्या जाणाऱ्या बालिश आणि बेजबाबदार विधानांमुळे गोंधळ होतो,असा मुद्दा त्यांनी याचिकेत नमूद केला होता व राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वाचन करावे आणि स्वतःचे ज्ञान वाढवावे,असे निर्देश न्यायालयाने त्यांना द्यावेत,असे पंकज फडणीस यांनी याचिकेत मागणी केली होती.त्यावर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अलोक अराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंठपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली.न्यायालय म्हणाले, “तुम्ही तुमच्या याचिकेत विनंती केली आहे की,आम्ही त्यांना निर्देश द्यावेत की,त्यांनी व्यक्तिशः अभ्यास करावा आणि तुमच्या याचिकेनुसार वाचन करावे,अशी सक्ती न्यायालय करू शकत नाही?”, असा उलट सवाल न्यायालयाने याचिकाकर्त्याला केला.त्यानंतर याचिकाकर्ता न्यायालयात म्हणाला की, “ते विरोधी पक्षनेते आहेत आणि ते गोंधळ तयार करत आहेत.जर ते पंतप्रधान झाले,तर ते कहरच करतील.” याचिकाकर्त्याच्या पंतप्रधान होण्याबद्दलच्या युक्तिवादावर न्यायालय म्हणाले, “आम्हाला माहिती नाही.तुम्हाला माहिती आहे का की ते पंतप्रधान होणार आहेत?” तुम्ही कशावरून सांगताय की ते पंतप्रधान होणार?न्यायालयाने याचिकाकर्त्याला सांगितले की,वीर सावरकरांचे पणतू आधीच पुण्यातील न्यायालयात गेले आहेत.त्यांनी बदनामीची(मानहानी) याचिका दाखल केली आहे.याच मुद्द्यावर तिथे अगोदरपासून सुनावणी सुरू आहे. याचिकाकर्त्याने वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती,पण न्यायालयाने याचिका फेटाळून लावली,असे सांगत न्यायालयाने फडणीस यांचीही याचिका फेटाळून लावली व राहुल गांधी यांना दिलासा दिला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

यंदाही होणार बौद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात वन्यप्राण्यांची गणना..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-बौद्ध पौर्णिमेच्या रात्री देशातील सर्व अभयारण्यातील वन्यजीवांची गणना केली जाते. त्यासाठी अभयारण्याच्या परिसरात वनविभागातर्फे मचाण उभारल्या जातात.त्यावर बसून वनविभागाचे कर्मचारी सर्व...

तीनजण नदीत बुडाले; वडील मुलगी आणि भाची..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या बाप- लेकीचा तसेच भाचीचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज, मंगळवार २८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या...

सेवा हक्क दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना नागरिकांना पारदर्शक,वेळेत व सुलभ सेवा देण्याची शपथ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सेवा हक्क दिनानिमित्त आज,मंगळवार २८ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत नागरिकांना पारदर्शक,वेळेत...

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ बागेश्वर बाबाला चपलेचा प्रसाद.. – आरमोरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस कमिटी आक्रमक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-नुकतेच धिरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम बाबाने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ आज,मंगळवार २८ एप्रिल रोजी आरमोरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!