उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गत फेब्रुवारी व मार्च महिन्यात दहावी व बारावीची परीक्षा घेतली होती.त्यात ३७ हजार ३३८ विद्यार्थ्यांनी बारावीची,तर ३२ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षा संपल्यानंतर आता विद्यार्थी व पालकांना परीक्षेच्या निकालाची उत्सुकता लागली आहे.बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला बारावीचा निकाल एप्रिल महिन्याच्या शेवटची लागण्याची शक्यता व्यक्त केली होती.पण,मध्येच कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्याने सदरचा निकाल आठवडाभर लांबण्याची शक्यता आहे.त्यानुसार,आता हा निकाल पुढील आठवड्यात ५ किंवा ७ मे रोजी लागण्याची शक्यता आहे.बारावीचा निकाल लागल्यानंतर आठवड्याभरात म्हणजेच १५ मेपूर्वी दहावीचा निकालही घोषित होण्याची शक्यता आहे.त्यामुळे,राज्यातील लाखो विद्यार्थी व पालकांची प्रतीक्षा संपणार आहे.
इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचा निकाल लवकरच..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

