- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-राज्यात पावसाने सर्वत्र धूम ठोकली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विविध जिल्ह्यात आभार फाटल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.पुणे आणि सातारा जिल्ह्यात पूर स्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.अश्यातच कालपासून ते आज,सोमवार २६ मे रोजी मुंबईत सुरू असलेल्या पावसाने सर्व रेकॉर्ड मोडीत काढून मे महिन्यात मुंबईत १०७ वर्षांतील सर्वात जास्त पाऊस पडला आहे.आज सोमवारी सुरू असलेल्या पावसाने हाहाकार माजला आहे.सर्वत्र अंधार पसरलेला असून पावसाने मागील सर्व विक्रम मोडले आहेत.मुंबईत मान्सूनने नवा विक्रम केला आहे.१६ दिवस आधीच मान्सून मुंबईत दाखल झाला आहे.११ जूनला दाखल होणारा मान्सून यंदा आज २६ मे रोजी दाखल झाल्याचे भारतीय हवामान विभागाचे म्हणणे आहे.खबरदारी म्हणून एनडीआरएफ (NDRF)चे पथक दाखल झाले आहे.मुंबईत तर पावसामुळे भयानक स्थिती निर्माण झाली आहे.मागील चार दिवसांपासून सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे सातारा जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली.अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. साताऱ्यातील संगम माहुली येथील नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात सध्या वाढ झालेली आहे.पुणे जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे.पुण्यात मे महिन्यातील रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली आहे. इंदापूर,बारामती,दौंडला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बारामती आणि दौड परिसरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.काल रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे बारामतीतील नीरा कालवा फुटला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- Advertisement -

