Wednesday, July 15, 2026
Homeकुरखेडामावळत्या वर्षाला रक्तदानाने निरोप देण्याची १५ वर्षाची परंपरा कायम राहणार.. - सत्कार्यात...

मावळत्या वर्षाला रक्तदानाने निरोप देण्याची १५ वर्षाची परंपरा कायम राहणार.. – सत्कार्यात सहभागी होण्याचे आवाहन.. – कुरखेडा नगर पंचायतीचे नगरसेवक सागर निरंकारी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-स्वर्गीय विक्रांत वारजूरकर व स्वर्गीय जिग्नेश धंधूकीया यांच्या स्मृती प्रित्यर्थ मागील १५ वर्षांपासून कुरखेडा शहरातील युवक मंडळी पुढाकार घेत नविन वर्षाचे स्वागत सत्कार्यात व्हावे व नव्याने रूजू झालेली हूळदंगी परंपरेला आळा बसावा; या उद्देशाने ३१ डिसेंबर रोजी मावळत्या वर्षाला रक्तदान सारख्या सामाजिक उपक्रमाद्वारे स्वागत करण्याची १५ वर्षापासूनची परंपरा यावर्षी सूद्धा कायम राहणार असल्याने युवकांनी या सत्कार्यात सहभागी व्हावे; असे आवाहन कुरखेडा नगरपंचायतीचे नगरसेवक सागर निरंकारी यांनी केले आहे.
अलीकडे मावळत्या वर्षाला निरोप देतांना व नविन वर्षाचे स्वागत करतांना नविन युवकांची पीढी बेभान होत व्यसनाधिनतेचा कळस गाठत आहे.नव्या पीढीत नको त्या व्यसनाचा शिरकाव थर्टी फर्स्ट निमित्त आयोजित होणाऱ्या पार्टी मधूनच होत असतो.या रूजू झालेल्या वाईट परंपरेला फाटा देण्याकरीता मागील १५ वर्षांपासून कुरखेडा येथील काही सामाजिक कार्यकर्ते पूढाकार घेत युवकांना वर्षाचा निरोप व नविन वर्षाचे स्वागत थर्टी फर्स्ट चा हूळदंग पणाने न करता रक्तदान करीत आपली सामाजिक जाबदारीचे भान ठेवण्याचे आवाहन करीत आहेत.या उपक्रमाला मागील १५ वर्षांपासून मोठा प्रतिसाद सुद्धा मिळत आहे.यावर्षी सुद्धा मंगळवार ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दूपारी १ वाज़े दरम्यान सिंधी भवन कुरखेडा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबीरात मोठ्या संख्येनी युवकांनी सहभागी होत आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी; असे आवाहन नगरसेवक सागर निरंकारी, मधुकर वारजूरकर,यशपाल सहारे,सोनू रहांगडाले, विवेक निरंकारी,प्रवेश सहारे,मयुर सहारे, आशु बागडे गोलू वैद्य,नौशाद सय्यद,पंकज टेंभूर्णे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्याच्या विविध भागात पाऊस करणार दमदार एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त :- 'नैसर्गिक आपत्तीस मंडळ जबाबदार राहणार नाही' अश्या म्हणण्याप्रमाणे पावसाचे काही खरे नाही.कुठे मुसळधार पडतो तर कुठे पाण्याचा एक थेंबही पडत नाही.त्यातच...

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!