Saturday, May 23, 2026
Homeचंद्रपूरमहाशिवरात्रीनिमित्त दर्शनाला गेलेल्या भाविकांच्या वाहनाचा अपघात; एकाचा मृत्यू,तर १७ जण जखमी..

महाशिवरात्रीनिमित्त दर्शनाला गेलेल्या भाविकांच्या वाहनाचा अपघात; एकाचा मृत्यू,तर १७ जण जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-महाशिवरात्रीनिमित्त दर्शनाला गेलेल्या भाविकांच्या वाहनाचा अपघात होऊन एका १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला,तर १७ जण जखमी झाल्याची घटना आज,रविवार १५ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील पाटाळा गावाजवळ घडली.भूषण विजय दोडके वय १७ वर्षे, रा.पाटाळा, ता.भद्रावती,जि.चंद्रपूर असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.घटना घडताच सर्व जखमींना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,यातील १२ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
आज महाशिवरात्री असल्याने अनेक भाविक भक्त शिवाची पूजा अर्चना करण्यासाठी तसेच दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात गेले होते.अश्याच प्रकारे पाटाळा परिसरातील शिवभक्त एमएच ३४ बी झेड ९४७८ क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने त्रिशूल घेऊन दर्शनासाठी गेले होते.दर्शन करून परत येत असतांना सर्वजण पाटाळा गावाजवळील राळेगाव येथील जगन्नाथ मठावर दर्शनासाठी जात असतांना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन पलटी झाला. यात १७ वर्षीय तरुण वाहनाखाली दबल्याने जागीच मृत पावला.तर १७ भाविक जखमी झाले.यात पाच जण किरकोळ जखमी झालेत.किरकोळ जखमींमध्ये प्रवीण आवारी,गुरुवेश राजेश जाधव वय १४ वर्षे,ओंकार शिवशंकर मांढरे वय ९ वर्षे,प्रतीक पारखी आणि रोहित झाडे यांचा समावेश आहे.यांचेवर वरोरा रुग्णालयात उपचार करण्यात आले.तर गंभीर जखमींमध्ये नानाजी मरस्कोल्हे वय ७० वर्षे,गणेश खापणे वय ४० वर्षे,मारोती शिवरकर वय ४५ वर्षे,विनोद गौरकर वय ५० वर्षे,रोशन माडवे वय १७ वर्षे,मारोती बदखल वय ५० वर्षे,सोहम भोयर वय १६ वर्षे,मयूर वनशिंगे वय १६ वर्षे,राजू किसन शिवरकर वय ४२ वर्षे,राजू जाधव वय ४० वर्षे,मंथन डाहूले वय १३ वर्षे,लकी भडके वय २० वर्षे अशी जखमींची नावे असून यांचेवर चंद्रपूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनेने पाटाळा व राळेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

प्रलंबित बिल आणि नवीन काम देण्यासाठी दोन टक्के दराने मागितले ७० हजार.. -जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कामाचे प्रलंबित असलेले बिल काढून देण्यासाठी व नवीन काही कामे तुम्हालाच देणार म्हणून दोन टक्के प्रमाणे ७० हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या जलसंपदा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!