Sunday, April 19, 2026
Homeचंद्रपूरबुध्द पौर्णिमेच्या रात्री वन्यप्राणी प्रगणना पडली पार..-ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर व बफर...

बुध्द पौर्णिमेच्या रात्री वन्यप्राणी प्रगणना पडली पार..-ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर व बफर झोनमध्ये ५,००९ वन्यप्राण्यांची झाली नोंद…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर व बफर झोनमध्ये ११ वनपरिक्षेत्रामध्ये बुध्द पौर्णिमेच्या रात्री वन्यप्राणी प्रगणना पार पडली.कोअर व बफर झोन मध्ये ५५ वाघ,१७ बिबट तर ६५ अस्वल आढळून आली.दोन्ही ठिकाणी ५००९ वन्यप्राण्यांची नोंद घेण्यात आली.विशेष म्हणजे दोन्ही झोमनमध्ये वाघांची संख्या ३२, बिबट १ तर अस्वलांची संख्या ४० ने वाढली आहे.

 कोअर व बफर झोनमध्ये ११ वनपरिक्षेत्रामध्ये बुध्द पौर्णिमेच्या रात्री वन्यप्राणी प्रगणना करण्यात आली.यामध्ये ५५ वाघ, १७ बिबट, ८६ रानकुत्रे, ६५ अस्वल, १४५८ चितळ, ४८८ सांबर, ५५९ रानगवे आढळले.एकूण ५,००९ वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली आहे.

परंपरागत काळापासून बुध्द पौर्णिमेच्या रात्री करण्यात येत असलेल्या ताडोबाच्या कोअर झोनमध्ये ५ वनपरिक्षेत्रात ७६ मचाणी तर बफर झोनमध्ये ६ वनपरिक्षेत्रात ७९ मचाणी उभारण्यात आलेल्या होत्या.बफरमध्ये राज्यभरातील १६० पर्यटनप्रेमींनी चंद्राच्या लख्ख प्रकाशात वन्यप्राण्यांच्या नोंदी घेतल्या. कोअर झोनमध्ये वनाधिकार व क्षेत्रीय वन कर्मचा-यांनी प्राणी गणना केली.कोअर व बफर क्षेत्र मिळून ५५ वाघ, १७ बिबट, ८६ रानकुत्रे, ६५ अस्वल,१४५८ चितळ, ४८८ सांबर, ५५९ रानगवे आणि मांसभक्षी व तृणभक्षी २७२८ असे एकूण एकूण ५,००९ वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली आहे.

बफरझोनमध्ये वाघ २६ आढळून आले असून एका बच्छड्याचा समावेश आहे.मागील वर्षी फक्त १४ वाघ आढळून आले होते.यावेळी ११ ने वाघाची संख्या वाढली आहे.बिबट ८ आढळून आले असून यावेळी ४ ने संख्या कमी झाली आहे.अस्वलाची संख्या तब्ब्ल ३२ झाली असून मागील वर्षीपेक्षा अस्वलांच्या संख्येत २७ ने वाढ झाली आहे.तृणभक्ष्यी प्राण्यांमध्ये भेडकी १८, चितळ ४०३, सांबर १६६, चौसिंगा ८, निलगाय ३४, रानगवा ३४४ असे एकूण ९७३ प्राण्यांची नोंद करण्यात आली.तसेच वानर ३४०, रानडुक्कर ३६३, रानकुत्रा १७, सायळ १, मुंगूस १० आढळून आले. मांजर प्रकारामध्ये जवादी मांजर २,उदमांजर ४, रानमांजर ३, खवल्या मांजर ९ तर इतर ३२ वन्यप्राण्यांची नोंद घेण्यात आली.विषेश म्हणजे यावेळी मोरांच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत.पर्यटन प्रेमींना मोरांना जवळून पाहता आले.मोरांची ९७ संख्या आढळून आली.चिकारा,कोल्हे व तडसाची नोंद आहे.

सर्वात जास्त वन्यप्राणी खडसंगी वनपरिक्षेत्रात ५११, त्यापाठोपाठ मोहूर्ली मध्ये ४८१, मुल ३४१,शिवणी ३१६ वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली.सर्वात कमी वन्यप्राणी चंद्रपूर १४६, पळसगाव मध्ये १२२ ची नोंद करण्यात आली.सर्वात जास्त वाघ शिवणी वनपरिक्षेत्रात १०,मूल मध्ये ७,मोहूर्ली ५,खडसंगी ३, तर पळसगाव क्षेत्रामध्ये १ एकाची नोंद घेण्यात आली. चंद्रपूर वनपरिक्षेत्रात एकही वाघाची नोंद झाली नाही. कोअर झोनमध्ये २९ वाघ, ९ बिबट, ६९ रानकुत्रे, ३३ अस्वल, २१५ रानगवे, १०५५ चितळ, ३२२ सांबर आणि मांसभक्षी व तृणभक्षी १३६० असे एकूण ३,०९२ प्राण्यांची नोंद झाली आहे.मागील मागील वर्षीच्या तुलनेत वाघांची संख्या १० ने वाढली आहे. बिबट ५ तर अस्वलाची संख्या १३ ने वाढली आहे.

मागील काही महिण्यापासून अवकाळीमुळे ताडोबातील नैसर्गीक स्त्रोतामध्ये पाणी साठून असल्याने वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाणी टंचाई भासली नाही.पाणवठ्यावरूनही वन्यप्राण्यांची तहान भागत असल्याचे चित्र ताडोबात पाहायला मिळत असतानाच पाणवठे व नैसर्गीक स्त्रोतावर वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने समाधान कारक नोंदी करण्यात आल्या.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!