Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरबांधकाम ठेकेदार आर्थिक अडचणीत; हजारो कोटींची बिले सरकारकडे प्रलंबित..!

बांधकाम ठेकेदार आर्थिक अडचणीत; हजारो कोटींची बिले सरकारकडे प्रलंबित..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज 
नागपूर :-शासनाकडून मोठ्या प्रमाणावर बांधकामे करवून घेण्यात आलीत.यासाठी ठेकेदारांनी  कामाच्या पूर्ततेसाठी मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतवलेल्या आहेत.बांधकाम व इतर कामे करण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतले आहे.शासनाकडे हजारो कोटींची रक्कम थकीत असल्याने व्यवसाय  करायचा कसा? व बँकांचे कर्ज भरायचे कसे? असा प्रश्न आमच्या समोर उभा येऊन ठाकला असल्याचे मत बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया बुटीबोरी शाखेचे अध्यक्ष नितीन साळवे यांनी व्यक्त केला आहे.राज्य शासनाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे करण्यात आलेल्या कामांचे ४६ हजार कोटी रुपये, ग्रामविकास विभागाचे ८ हजार कोटी रुपये, जलजीवन मिशन योजनेतील कामांचे १८ हजार कोटी रुपये, जलसंपदा विभागाचे १९ हजार ७०० कोटी रुपये तर नगरविकास विभागांतर्गत करण्यात आलेल्या कामांचे १७ हजार कोटी रुपयांची बिले(देयक)राज्य सरकारकडे तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत.लाडकी बहीण योजनेसाठी दर महिन्याला हजारो कोटी रुपये खर्च होत असल्याने सरकारी तिजोरीवर मोठ्या प्रमाणावर ताण पडला आहे.अशातच आता बांधकाम ठेकेदारांची (कंत्राटदार) हजारो कोटींची रक्कम शासनाकडे प्रलंबित असल्याने  बांधकाम व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांच्या कामाना मंजुरी दिली.कार्यारंभ आदेश मिळताच ठेकेदारांनीही जलद बिले मिळावीत म्हणून गतीने कामे केली. त्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले.त्यातील सर्वाधिक कामे ही सार्वजनिक बांधकाम विभागाचीच आहेत. त्याखालोखाल जलजीवन मिशन,पाणीपुरवठा विभागाची आहेत.कंत्राटदारांना आता बँका आणि जीएसटी विभागाकडून नोटीस बजावल्या जात आहेत.याआधी असे कधी घडत नव्हते.देणी सहा ते सात महिन्यांत मिळत होती. परंतु,आता तीन वर्षांपासूनची देणी थकीत आहेत.यातच आता दीड लाख कोटी रुपयांची कामे सरकारने काढली आहेत.आधीचेच पैसे मिळालेले नाहीत.त्यात नवीन कामे प्रस्तावित करण्यात आल्याने अडचणी वाढणार आहेत.बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाकडून सरकारकडे थकीत रक्कम मिळावी म्हणून पाठपुरावा केला जात आहे.मात्र,शासनाकडून रक्कम मिळत नसल्याने अनेक कामे बंद होऊन हजारो कामगार बेरोजगारीच्या उंबरठ्यावर उभे आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!