Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरपाय घसरला अन् आईसह चिमुकला पडला कालव्यात.. - दोघेही वाहून गेले; शोधकार्य...

पाय घसरला अन् आईसह चिमुकला पडला कालव्यात.. – दोघेही वाहून गेले; शोधकार्य सुरू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-कालव्याच्या पुलावरून पायी जात असतांनाच अचानक पाय घसरला आणि आईने हात पकडुन ठेवलेला पाच वर्षीय चीमुकलाही पेंच जलाशयाच्या डाव्या कालव्यात पडल्याची घटना पारशिवनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पटगोवारी शिवारात काल मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली असून सायंकाळपर्यंत त्या दोघांचा कुठेही थांगपत्ता लागला नव्हता.पारशिवनी तालुक्यातील पेंच जलाशयाचा डावा कालवा माहुली,पटगोवारी मार्गे रामटेक तालुक्यातून भंडारा जिल्ह्यात जातो.त्यात पाणी सोडण्यात आल्याने तसेच पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने दोघेही वाहून आई सह मुलगाही वाहून गेला.अल्का शेखर बिहुने वय २८ वर्षे व अरमान शेखर बिहुने वय ५ वर्षे दोघेही रा.पटगोवारी,ता.रामटेक,जि.नागपूर अशी वाहून गेलेल्या आई व मुलाचे नाव आहे.
अल्का तिच्या मुलाला घेऊन काल मंगळवारी दुपारी पटगोवारी चिचभुवन पारशिवनी मार्गावरील पुलावर गेली होती.या परिसरात काही मजूर काम करीत होते.त्यानंतर ती मुलाला घेऊन पुलाच्या उजव्या बाजूला असलेल्या कालव्याच्या रस्त्याने पायी जायला निघाली,असे प्रत्यक्ष दर्शिंनी बघितले.या पुलापासून किमान पाचशे मीटर अंतरावर तिचा पाय घसरला आणि दोघेही कालव्यात पडले.कालव्यातील पाण्याचा प्रवाह गतिमान असल्याने दोघेही रामटेक तालुक्याच्या दिशेने वाहत गेले.माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते,ठाणेदार राजेशकुमार थोरात,हवालदार पृथ्वीराज चव्हाण,मुद्दसर जमाल, देवा उकेबोंद्रे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून दोघांचाही शोध सुरू केला.सायंकाळपर्यंत ते कुठेही आढळून आले नाहीत. अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले असून आज,बुधवार १३ ऑगस्ट रोजी पुन्हा शोधकार्य राबविण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!