Saturday, June 20, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनव्या जिल्हानिर्मितीची चर्चा सुरू असली तरी प्रत्यक्षात जिल्हानिर्मिती नाहीच..! - एका जिल्हानिर्मितीसाठी...

नव्या जिल्हानिर्मितीची चर्चा सुरू असली तरी प्रत्यक्षात जिल्हानिर्मिती नाहीच..! – एका जिल्हानिर्मितीसाठी किमान पाच हजार कोटी रुपयांची गरज…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सध्याच्या घडीला राजकीय वर्तुळात आणि समाज माध्यमांवर नव्या जिल्हानिर्मितीची चर्चा सुरू असली तरी प्रत्यक्षात अशी जिल्हानिर्मिती होणार नसल्याची खात्रीलायक माहिती आहे.एका जिल्हानिर्मितीसाठी किमान पाच हजार कोटी रुपयांची गरज असते.राज्याची सध्याची आर्थिक चणचण पाहता जिल्हानिर्मिती अशक्य असल्याचे महसूल विभागातील अधिकाऱ्याने स्पष्ट केले.काँग्रेस राजवटीत तत्कालीन आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या पाठपुराव्यामुळे ऑगस्ट २०१४ रोजी राज्यात पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यानंतर गेल्या १० वर्षांत एकही नवा जिल्हा अस्तित्वात आला नाही.पालघर जिल्हानिर्मितीसाठी त्यावेळी साडेतीन हजार कोटी रुपये खर्च आला. इतका खर्च करूनही तेथे प्रशासनाची घडी बसलेली नसून आजही पालघरला ठाणे जिल्ह्यावर अवलंबून राहावे लागत आहे.अशी प्रक्रियाच सुरू नाही.जिल्हा किंवा तालुकानिर्मिती करायची असल्यास प्रस्ताव तयार करून सविस्तर चर्चा केली जाते.मग मसुदा प्रसिद्ध करून हरकती मागवल्या जातात.हरकतींचा विचार केल्यानंतरच जिल्हानिर्मितीची अंतिम अधिसूचना जारी होऊन जिल्हानिर्मितीच्या प्रक्रियेला सुरुवात होते.सध्या अशी प्रक्रिया सुरू नसल्याने २६ जानेवारी रोजी सरकार नवीन जिल्हानिर्मितीची घोषणा करणार ही अफवाच ठरणार आहे.जिल्हानिर्मितीसाठी किमान १५ कार्यालयांची उभारणी करावी लागते.जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक,शिक्षणाधिकारी,दिवाणी न्यायालय, जिल्हा कारागृह,शासकीय रुग्णालय,तहसील आणि त्यांना सहायक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते.
या कार्यालयांसाठी भूसंपादन,इमारती बांधणे,पाणी, वीज आणि कर्मचारी वेतनावर मोठा खर्च लागतो. वाहन ताफा आणि इंधन खर्चाची तरतूद करावी लागते. भूसंपादनानंतर जमिनीचा मोबदला देण्यासाठी सरकारच्या तिजोरीवर भार पडू शकतो.तो झेलण्याची ताकद नसल्याने सरकारने सध्या तरी नवीन जिल्हानिर्मितीच्या विचारात नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
राज्य सरकारचा महसूल आणि खर्च यांच्यातील तफावतीला वित्तीय तूट म्हटले जाते.राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेल्या विविध लोकप्रिय घोषणांमुळे राज्याची वित्तीय तूट २ लाख कोटींवर पोहोचली आहे.राज्यावरील कर्ज ८ लाख कोटींच्या घरात पोहोचले आहे.राज्य सरकारला वेतन,निवृत्ती वेतन व विविध कर्जावरील व्याज यांच्यासाठी चालू आर्थिक वर्षात २ लाख ७५ हजार ६१५ कोटींचा खर्चाचा भार वाहावा लागत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!