- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा व उमरझरी परिसरात नरभक्षक वाघिणीने धुमाकूळ घातल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येत काल रविवारी साकोली-तिरोडा मार्ग रोखून धरला.नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे प्रवेशद्वार असलेल्या शिवनटोला आणि पिटेझरी भागात सकाळी अकरा वाजतापासून नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. आंदोलनाची माहिती मिळताच साकोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिवम विसापुरे,सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू साळवे, आशिष बोरकर,लाखनीचे पोलिस निरीक्षक बारसे, पोलिस उपनिरीक्षक निता इवनाते आणि अर्जुन बेडवाल यांच्यासह मोठा पोलिस ताफा घटनास्थळी दाखल झाला.जोपर्यंत वाघिणीचा बंदोबस्त करण्यात येत नाही,तोपर्यंत आंदोलन सुरू राहील,असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता.पोलिसांनी परिसरातील ग्रामस्थांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला,मात्र ग्रामस्थ आपल्या मागण्यांवर ठाम होते.तर दुसरीकडे,वन विभागाने वाघिणीला जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरा लावला व विशेष रेस्क्यू टीम तैनात करण्यात आली आहे.वाघिणीवर नजर ठेवण्यासाठी तात्पुरता टॉवर उभारला जात असून,तिला दिसताच ट्रॅक्विलायझर गनने बेशुद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाघिणीचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याऱ्यांचाही वापर केला जात आहे.विशेष म्हणजे,परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला होता.तर शनिवार,२८ मार्च २०२६ रोजी उमरझरी परिसरात ४८ वर्षीय माया रामकृष्ण सोनवाने
यांच्यावर वाघिणीने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते.सध्या त्या भंडारा जिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहेत.

- Advertisement -

