Sunday, May 31, 2026
Homeमुंबईअखेर बँकांतील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा..

अखेर बँकांतील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली होती.त्यानुसार,आता योजनेच्या अंमलबजावणीला वेग आला आहे.विशेष म्हणजे,सहकार विभागाने जिल्हा मध्यवर्ती आणि राष्ट्रीयीकृत बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती संकलित केली आहे.राज्यस्तरीय बँकर्स कमिटीने थकबाकीदार शेतकऱ्यांचा सविस्तर अहवाल तयार केला असून,यामुळे सुमारे २४ लाख ७३ हजार ५६६ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. अहवालानुसार,राज्यातील १ कोटी ३३ लाख शेतकऱ्यांपैकी सुमारे २४ लाख ७३ हजार शेतकरी थकबाकीदार आहेत.त्यांच्याकडे एकूण ३५ हजार ४७७ कोटी रुपयांची थकबाकी आहे.यात सोलापूर,पुणे, नाशिक,छत्रपती संभाजीनगर,धाराशिव,नांदेड आणि अहिल्यानगरसह एकूण १४ जिल्ह्यांमध्ये थकबाकीचे प्रमाण सर्वाधिक आहे.केवळ पीककर्जच नव्हे,तर मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जाचाही यात समावेश करण्यात आला असून,३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकबाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. ३० जूनपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विवाहित महिलेचा गळा चिरून हत्या करणारा आरोपी अटकेत.. – क्षुल्लकशा कारणावरून हत्या; बालपणापासून होते प्रेमप्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवार...

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने...

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!