Thursday, April 16, 2026
Homeभंडारा'तिने' अचानकपणेच उचलले टोकाचे पाऊल; घरातील पंख्याला नायलॉन दोराच्या सहाय्याने घेतला गळफास..

‘तिने’ अचानकपणेच उचलले टोकाचे पाऊल; घरातील पंख्याला नायलॉन दोराच्या सहाय्याने घेतला गळफास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-भंडारा जिल्ह्याला जणूकाही ग्रहण लागले की काय? असे हल्ली निदर्शनास येऊ लागले आहे.जिल्ह्यात दररोज कुठली ना कुठली तरी अनुचित घटना घडत आहे.कधी अपघात,तर कधी आत्महत्या,तर कधी अपहरण व नाना तऱ्हेचे प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत.अशातच आता काल सोमवारी १७ मार्चच्या सकाळी भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील अड्याळ येथील ढीवर मोहल्ल्यात एका ३८ वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.३८ वर्षीय महिलेने घरातील पंख्याला नायलॉन दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.हर्षा खेमराज उईके रा.अड्याळ,ता.पवनी,जि.भंडारा असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
माहितीनुसार,घटनेच्या एक दिवसापूर्वी हर्षा व १३ वर्षीय लहान मुलगा सुशांत हे दोघेही रविवारी रात्रीच्या सुमारास टिव्ही बघत होते.परंतु,काल सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास नळाचे पाणी आल्याने तिला शेजारच्या महिलेने आवाज दिला.यावेळी सुशांतने दार उघडले व आई अंथरूणावर नाही पाहून तिला पाहण्यासाठी घरातील आतल्या खोलीत गेला असता तो समोरील दृश्य पाहून जोरजोराने रडायला लागला.शेजारच्यांनी तेथे जात ही माहिती तत्काळ गावातीलच अड्याळ पोलिस ठाण्यात दिली.यानंतर ठाणेदार धनंजय पाटील तसेच पोलिस कर्मचारी, होमगार्ड व पोलिस पाटील हे घटनास्थळी दाखल झाले.घटनेचा पंचनामा करून शवविच्छेनानंतर काल सोमवारीच अड्याळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.घटना घडली तेव्हा घरात तिचा लहान मुलगा व हर्षा हे दोघेच होते.पती व मोठा मुलगा हे बाहेरगावी कामावर गेले होते.महिलेने आत्महत्या कां केली? याचा तपास अड्याळ ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार फुलचंद मेश्राम तसेच पोलिस हवालदार सुभाष रहांगडाले करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे अहिल्यानगर जिल्ह्यात सन्मानित.. – ‘सैराट’ चित्रपटाची शुटींग जिथे पार पडली; अशा महाविद्यालयात वितरण सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.कर्जत तालूका साहित्यप्रेमी मंडळ व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!