- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-नागपुरात औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करीत काल सोमवारी दुपारच्या सुमारास विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.त्यातच संध्याकाळी सातच्या सुमारास दुसरा गट रस्त्यावर उतरला.त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली.काही ठिकाणी वाहने पेटवून देण्यात आली.शिवाजी चौकात दोन गट आमनेसामने आले.त्यांना पोलिसांनी चिटणीस पार्कापर्यंत मागे ढकलले.परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.मात्र,त्यानंतरही तणाव कायम होता. दगडफेकीत १५ पोलिस जखमी झाले असून आता नागपुरातील काही भागात पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.नागपुरात काल सोमवारी रात्री झालेल्या दगडफेक आणि जाळपोळच्या घटनेनंतर शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.अशातच आता भारतीय नागरीक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत नागपूर शहरातील विविध भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.नागपूर शहरातील कोतवाली,गणेशपेठ,लकडगंज,पाचपावली,शांतीनगर, सक्करदरा,नंदनवन,इमामवाडा,यशोधरा नगर आणि कपिल नगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदी आदेश लागू राहणार आहे.नागपूरचे पोलीस आयुक्त रविंदर कुमार सिंगल यांनी यासंदर्भात आदेश जारी करुन पुढील सूचना मिळेपर्यंत निर्बंध लागू राहणार असल्याचे म्हटले आहे.
- Advertisement -

