Wednesday, June 24, 2026
Homeदेसाईगंज'तप्ती-जलती घमोरियो में' देसाईगंज वीज वितरण कंपनी नागरिकांच्या जीवावर उठली? - गावे,शहरे...

‘तप्ती-जलती घमोरियो में’ देसाईगंज वीज वितरण कंपनी नागरिकांच्या जीवावर उठली? – गावे,शहरे भट्टीसारखी तापत असतांना वेजेचा लपंडाव..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-यंदा एप्रिल महिन्यातच दिवसागणिक उन्हाची तीव्रता अधिकच वाढत चालली आहे.तीव्र उन्हाचा आरोग्याला फटका बसत आहे. वातावरणात उष्मा वाढू लागल्याने भर दुपारी नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत.त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट असतो.प्रत्येकजण उन्हापासून बचाव करण्यासाठी थंडगार सावलीचा आसरा शोधत आहेत.नागरिक उकाड्याने हैराण झाल्याने घरातील कूलर,पंखे गरगर फिरू लागले आहेत.अशातच गावे,शहरे भट्टीसारखी तापत असतांना दिवसाढवळ्या तसेच रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसासारखी बत्ती गुल होऊ लागल्याने ‘तप्ती-जलती घमोरियो में’ देसाईगंज वीज वितरण कंपनी नागरिकांच्या जीवावर उठली की काय? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.सूर्यनारायण वर येऊ लागला की,सकाळी ९ ते १० वाजल्यापासून उन्हाच्या चटक्यांनी नागरिक हैराण होऊ लागले आहेत.ग्रामीण भागात वाढत्या तापमानामुळे शेतकरी व मजूर हे सकाळच्या सुमारास कामधंद्यांना प्राधान्य देत आहेत.दुपारी उन्हाचा पारा चढत असल्याने घरातील कूलर,पंखे सुरू ठेऊन गर्मी पासून बचाव करण्याचा प्रयत्न करीत असतात. अशातच कधी भर दुपारीच तर कधी अर्ध्या रात्रीच बत्ती गुल होत असल्याने ‘हिट यार,हाय गर्मी’ असे म्हणावे लागत आहे.त्यामुळे देसाईगंज वीज पुरवठा कंपनीने थोडा तरी जनतेचा विचार करावा व विजेचा लपंडाव बंद करावा,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!