- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-यंदा एप्रिल महिन्यातच दिवसागणिक उन्हाची तीव्रता अधिकच वाढत चालली आहे.तीव्र उन्हाचा आरोग्याला फटका बसत आहे. वातावरणात उष्मा वाढू लागल्याने भर दुपारी नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत.त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट असतो.प्रत्येकजण उन्हापासून बचाव करण्यासाठी थंडगार सावलीचा आसरा शोधत आहेत.नागरिक उकाड्याने हैराण झाल्याने घरातील कूलर,पंखे गरगर फिरू लागले आहेत.अशातच गावे,शहरे भट्टीसारखी तापत असतांना दिवसाढवळ्या तसेच रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसासारखी बत्ती गुल होऊ लागल्याने ‘तप्ती-जलती घमोरियो में’ देसाईगंज वीज वितरण कंपनी नागरिकांच्या जीवावर उठली की काय? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.सूर्यनारायण वर येऊ लागला की,सकाळी ९ ते १० वाजल्यापासून उन्हाच्या चटक्यांनी नागरिक हैराण होऊ लागले आहेत.ग्रामीण भागात वाढत्या तापमानामुळे शेतकरी व मजूर हे सकाळच्या सुमारास कामधंद्यांना प्राधान्य देत आहेत.दुपारी उन्हाचा पारा चढत असल्याने घरातील कूलर,पंखे सुरू ठेऊन गर्मी पासून बचाव करण्याचा प्रयत्न करीत असतात. अशातच कधी भर दुपारीच तर कधी अर्ध्या रात्रीच बत्ती गुल होत असल्याने ‘हिट यार,हाय गर्मी’ असे म्हणावे लागत आहे.त्यामुळे देसाईगंज वीज पुरवठा कंपनीने थोडा तरी जनतेचा विचार करावा व विजेचा लपंडाव बंद करावा,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
- Advertisement -

