Thursday, July 16, 2026
Homeचंद्रपूरचुकीचे औषध दिल्याने रुग्णाचा मृत्यू; ठाण्यात तक्रार दाखल….

चुकीचे औषध दिल्याने रुग्णाचा मृत्यू; ठाण्यात तक्रार दाखल….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- घुग्घूस येथील शिवानगर निवासी ५३ वर्षीय प्रवीण लिंगमपेल्ली यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी येथील खासगी रुग्णालयावर चुकीचे उपचार केल्याचा आरोप केला आहे.पोलिसांनी सध्या याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.पोलिस पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच कारवाई करणार असल्याचे ठाणेदार आसिफ राजा शेख यांचे म्हणणे आहे.मृतक व्यक्ती हा गुप्ता कोलवाशरीमध्ये सुपरवायजर म्हणून काम करत होता.

मंगळवारी २ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता प्रवीण लिंगमपेल्ली यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना उलट्या होऊ लागल्या.त्यांची प्रकृती पाहून कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ जवळच्या एका खाजगी रुग्णालयात नेले.तेथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून उपचार केले.रात्री ९ वाजे पर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि त्यांची तब्येत सुधारल्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिला.कुटुंबीयांनी त्यांना घरी आणल्यानंतर दोन तासांनी रात्री ११ वाजता त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली.यावेळी कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ राजीव रतन रुग्णालयात आणले,तेथे उपस्थित डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगून त्यांना तातडीने चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.त्याला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.दरम्यान काल,बुधवारी सकाळी मयताचा मुलगा प्रणय लिंगमपेल्ली व इतर नातेवाईकांनी पोलिस ठाणे गाठून सदर खासगी रुग्णालयाविरुद्ध चुकीचे औषध दिल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याची तक्रार दाखल केली.या प्रकरणी घुग्घूस पोलिसांनी सध्या गुन्हा दाखल केला आहे. संबंधित डॉक्टरला अटक करण्याची मागणी मृतकाचे नातेवाईक करत होते.यावर ठाणेदार आसिफ राजा शेख यांनी पीडित कुटुंबीयांना शवविच्छेदन अहवालात डॉक्टरने काही गैरप्रकार केल्याचे समोर आल्यास पोलिस संबंधित डॉक्टरवर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था "ना घर के ना घाट के" अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली असून मागील महिन्याच्या दीड हजाराची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.जून महिना संपून जुलै...

बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय; कामगारांना मिळणाऱ्या लाभ रकमेत वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मंडळाच्या चार प्रमुख कल्याणकारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!