Saturday, August 1, 2026
Homeनागपूरचालकाचा ताबा सुटला; अनियंत्रित ट्रक नाल्यात उलटला..

चालकाचा ताबा सुटला; अनियंत्रित ट्रक नाल्यात उलटला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सुसाट वेगाने वाहने पळवणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे; वेगात असलेले वाहन एकाएकी नियंत्रित न होता अनियंत्रित होऊन अपघात घडत असतात.तरीही अनेकजण अनभिज्ञ झाल्यासारखे वागतांना दिसून येतात.असाच प्रकार नागपूर-जबलपूर महामार्गावरील चोरबाहुली शिवारात काल,शनिवारी उघडकीस आला.चालकाचा ताबा सुटल्याने अनियंत्रित झालेला ट्रक महामार्गालगतच्या नाल्यात उलटला. अपघातात जीवितहानी टळली.मात्र, ट्रकचे मोठे नुकसान झाले.चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अनियंत्रित झालेला ट्रक महामार्गाच्या खाली नाल्यात उलटला.यात ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून,चालकास किरकोळ दुखापत झाली.घटनेची माहिती मिळताच ओरिएंटल टोल प्लाझावरील रुग्णवाहिका चमूचे डॉ.हनवत व चालक भिमटे यांनी घटनास्थळ गाठून जखमी चालकास ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सामाजिक वनीकरण विभागाचा विभागीय वन अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-तक्रारदारास तंबी देऊन तब्बल ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना बीड जिल्ह्याच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यास(DFO)छत्रपती संभाजीनगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

क्रिकेटपटू तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-क्रिकेटच्या मैदानावर मोठे नाव कमावण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या एका १७ वर्षीय क्रिकेटपटू तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना नागपूरच्या बजाजनगर पोलिस...

नव्या परिस्थितीनुसार आपत्ती व्यवस्थापनाची कार्यपद्धती विकसित करण्याची गरज.. -नदीकाठील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या-सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बदलत्या हवामानामुळे अल्प कालावधीत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश सहपालकमंत्री...

जिल्हा परिषदांसह मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार एकाचवेळी होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ५० टक्के ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या तब्बल २२ जिल्हा परिषदांच्या निवडणूका अद्यापही रखडल्या आहेत.विशेष म्हणजे,ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडल्या गेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!