Monday, May 25, 2026
Homeबीडकृषी महोत्सवाच्या नावाखालीअधिकारी, कर्मचाऱ्यांनी गाण्यांवर घातला धिंगाणा..

कृषी महोत्सवाच्या नावाखालीअधिकारी, कर्मचाऱ्यांनी गाण्यांवर घातला धिंगाणा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

बीड :- शासनातर्फे कृषी महोत्सवांचे आयोजन शेतकऱ्यांसाठी करण्यात येतात.कृषी महोत्सवांच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना नवीन प्रेरणा,कल्पना आणि शेती उपयोगी सर्वच माहिती मिळावी यासाठी लाखो रुपये खर्च करून कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.मात्र,शासनाच्याच अधिकाऱ्यांनी सर्व भान सोडून बेभान होऊन गाण्यांवर धिंगाणा घालण्यास सुरुवात केली.यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. 

बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठीच्या कृषी महोत्सवात, स्वर झंकार कार्यक्रमाच्या नावाने,आयोजक असणाऱ्या प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चक्क लावण्या,हिंदी गाण्यांवर धिंगाणा घालण्यास सुरुवात केली.यादरम्यान “अभी जिंदा हु तो जी लेने दो”या गाण्यावर गेवराईच्या तालुका कृषी अधिकाऱ्यासह इतर अधिकाऱ्यांनी डोक्यावर बॉटल घेऊन डान्स केला.तर “चंद्रा” या लावणीवर आयोजक असणाऱ्या प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांनी चक्क तोंडात फुल घेऊन कार्यक्रमाच्या नावावर धिंगाणा घातला.अधिकारी,कर्मचारी यांचा धिंगाणा पाहून, नेमके कृषी महोत्सव शेतकऱ्यांसाठी आहे की, अधिकाऱ्यांना आपली मौज मजा करत धिंगाणा घालण्यासाठी आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.अशा अधिकाऱ्यांवर खुद्द मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी; अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!