- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून
महिला सक्षमीकरणाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून,बालविवाह होऊ नये; यासाठी लोकचळवळ राबविणे महत्वाचे आहे.या अनुषंगाने उद्या शनिवार ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहेत.अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की,या विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून महिलांच्या हक्कांसाठी व्यापक लोकचळवळ उभी रहावी,महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रभावी धोरणे गावपातळीवर अंमलात यावीत आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबविल्या जाव्यात,हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.या विशेष ग्रामसभेमध्ये स्थानिक प्रशासन,स्वयंसेवी संस्था,महिला बचतगट,अंगणवाडी सेविका,आशा सेविका आणि नागरिकांनी महिलांच्या उन्नतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन मंत्री तटकरे यांनी केले आहे.
- Advertisement -

