Tuesday, September 1, 2026
Homeनागपूरउद्यापासून बारावी बोर्डाची परीक्षा; विभागात ५१४ परीक्षा केंद्रे..

उद्यापासून बारावी बोर्डाची परीक्षा; विभागात ५१४ परीक्षा केंद्रे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता बारावी बोर्डाची परीक्षा उद्या, मंगळवार १० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.यंदा नागपूर विभागात इयत्ता बारावीच्या परीक्षेस एकूण १ लाख ६० हजार २९२ विद्यार्थी बसणार असून विद्यार्थ्यांसाठी ५१४ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.यात नागपूर जिल्ह्यात ६५ हजार ४९९ विद्यार्थी,चंद्रपूर जिल्ह्यात २८ हजार ३०५ विद्यार्थी,गोंदिया जिल्ह्यात १९ हजार ८० विद्यार्थी,भंडारा जिल्ह्यात १७ हजार ३९३ विद्यार्थी,वर्धा जिल्ह्यात १६ हजार ६१९ विद्यार्थी तर गडचिरोली जिल्ह्यात १३ हजार ३९६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे,परीक्षा सुरळीत व सुरक्षितपणे पार पडावी यासाठी प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेसाठी ८४ गोपनीय केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.
इयत्ता बारावीची परीक्षा ही १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे.कॉपीमुक्त व पारदर्शक परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक करण्यात आले असून, त्याबाबत केंद्र संचालकांकडून लेखी हमी घेण्यात आली आहे. परीक्षा केंद्रात मोबाइल फोन,कॅलक्युलेटर,डिजिटल घड्याळ,कागदी चिठ्ठया,गाइड,आदी साहित्य नेण्यास सक्त मनाई आहे.सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीद्वारे निगराणी ठेवली जाणार असून,संवेदनशील केंद्रांवर विशेष बैठे पथके तैनात असतील.पोलिस विभागाकडून ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातूनही देखरेख केली जाण्याची शक्यता आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!