- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-आर्थिक परिस्थती बेताची असल्याने व घरगुती गॅस कनेक्शन व सिलिंडर खरेदी करण्याची ऐपत नसल्याने चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी सरपण (काड्या)गोळा करण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या पती-पत्नीवर दोन अस्वलांनी हल्ला चढवल्याने यात पत्नीचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना रामटेक वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चिचदा उपवन क्षेत्रातील मानेगाव बीटाच्या कक्ष क्रमांक-२९२ मध्ये रविवारी घडली.सुलोचना राजकुमार भलावी वय ३० वर्षे असे मृत पत्नीचे तर राजकुमार राजाराम भलावी वय ४८ वर्षे असे गंभीर जखमी पतीचे नाव असून,दोघेही उमरी (चिचदा),ता.रामटेक,जि.नागपूर येथील रहिवासी आहेत.दोघेही मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.दोघेही काल रविवारी दुपारी गावालगतच्या मानेगाव शिवारातील जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेले होते.सरपण गोळा करीत असतांनाच दोघांवर अस्वलाने अचानक हल्ला चढविला.त्यात दोघेही गंभीर जखमी झाले.या प्रकाराची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नेले.तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती सुलोचनाला मृत घोषित करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला तर राजकुमारवर उपचार सुरू केले.घटनेची माहिती होताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होत पुढील प्रक्रिया पार पाडून आर्थिक मदतीची तजवीज केली.स्थानिक सहायक वनसंरक्षक गोविंद लुचे यांच्या हस्ते सानुग्रह निधीचा धनादेश मृत महिलेचे पती राजकुमार भलावी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दोन्ही अस्वलांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
- Advertisement -

